सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लातूर आणि धाराशिवमध्ये वादळासह आणि विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुर्गम भागात 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.
सोलापुरात पक्ष्यांना घातक आजार, चिकन आणि अंडी खावीत की नाही? डॉक्टर म्हणतात…
advertisement
मुंबईत 22 मार्चला उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तापमानात वाढ झाल्याने मुंबईत दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 22 मार्च रोजी मुंबईत मुख्यतः निरभ्र आकाश असू शकतं.
22 मार्च रोजी पुण्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहून दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यातील तापमानात पुढील काही दिवसांत वाढ होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. दुपार किंवा सायंकाळनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात अंशतः घट झालेली दिसून येत आहे.
नाशिकमधील तापमानात 2 अंशांनी वाढ होऊन तेथील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 22 मार्च रोजी मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
नागपूरमधील तापमानात पुढील काही दिवसांत वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 22 मार्च रोजी नागपूरमधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी अंशतः ढगाळ आकाश राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या सर्व जिल्ह्यांत 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.