TRENDING:

Health Tips : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्तीसाठी तिळ सुपरफूड, रोज खाल्ल्याने आणखी होतील हे फायदे, Video

छत्रपती संभाजीनगर : सध्या सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीत, आपली रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा पातळी चांगली ठेवण्यासाठी कोणता पदार्थ सर्वात उपयुक्त आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? होय! तो म्हणजे तीळ. मकर संक्रांतीला तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणण्यामागे केवळ परंपरा नाही, तर एक मोठे आरोग्य गुपित दडलेले आहे. हिवाळ्यात तीळ खाल्ल्याने आपल्याला काय फायदे होतात पाहुयात.

Last Updated: December 06, 2025, 15:46 IST
Advertisement

"खूप काम करते, मला व्यायामाची काय गरज?" गैरसमजामुळे गृहिणींचा जीव धोक्यात, वेळीच 'ही' योगासनं सुरू करा!

घरातील रोजची कामं करतो म्हणजे वेगळ्या व्यायामाची गरज नाही,' असा अनेक गृहिणींचा गंभीर गैरसमज असतो. मात्र, हा गैरसमज त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. केवळ घरातील कामे करून शरीराला आवश्यक असलेला व्यायाम मिळत नाही. या चुकीच्या समजुतीमुळे गृहिणींचा जीव धोक्यात येतो! वेळीच सदृढ तब्येतीसाठी तुम्ही घरातच कोणती प्रभावी योगासनं सुरू करू शकता, हे लगेच जाणून घ्या!

Last Updated: December 06, 2025, 19:48 IST

पाटलांच्या घरात होतेय बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा, तिसरी पिढी जपतेय परंपरा, कारण आहे खास Video

सोलापूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय घटनेचे शिल्पकार तथा पददलितांचे तारणहार म्हणून लौकिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील अनेक घरांत त्यांची प्रतिमा असून काहीजण रोज त्यांची पूजा देखील करतात. असंच एक घर सोलापुरात असून गेल्या 70 वर्षांपासून हे पाटील कुटुंब देवदेवतांच्या पूजेआधी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करत आलं आहे. यामागे एक खास कारण असून याबाबतच शिवानंद पाटील यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली आहे.

Last Updated: December 06, 2025, 19:06 IST
Advertisement

मुंबईत 'बिगेस्ट बुक सेल'! 100 पेक्षा अधिक स्टॉल्स अन् 70% पर्यंत सूट; वाचकांना लॉटरी, Video

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 5 आणि 6 डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी परिसरात तसेच छत्रपती शिवाजी पार्कवर 100 पेक्षा अधिक पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी हे स्टॉल लावले असून वर्धा, नागपूर, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांतील व्यापारी आणि वाचकांची मोठी गर्दी दिसत आहे.

Last Updated: December 06, 2025, 18:01 IST

दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि 'ही' प्रेरणाभूमी, बाबासाहेबांशी थेट कनेक्शन, तुम्हाला माहितीये का लोकेशन?

सोलापूर - महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 साली मुंबई येथे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर त्यांच्या अस्थी कलशांचे महाराष्ट्रातील तीनच ठिकाणी दर्शन होते, मुंबई येथील चैत्यभूमी, नागपूर येथील दीक्षाभूमी यानंतर सोलापूर शहरातील प्रेरणाभूमी आहे. ही प्रेरणाभूमी आजही आंबेडकर अनुयायींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. या संदर्भात अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते आतिश बनसोडे यांनी दिली.

Last Updated: December 06, 2025, 17:28 IST
Advertisement

महाराष्ट्रातील या गावात बाबासाहेबांच्या अस्थी कशा आल्या? पाहा तेव्हा नेमकं काय घडलं होतं Video

अमरावती : अमरावतीपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेले नया अकोला हे छोटंसं गाव. आता हे गाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांसाठी तीर्थस्थान ठरले आहे. कारण इथेच बाबासाहेबांच्या काही अस्थी जतन करून ठेवलेल्या आहेत. दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि 9 डिसेंबरला अस्थिस्थापना दिनी येथे हजारो भाविक दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहतात. पण, सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की, बाबासाहेबांच्या अस्थी येथे आल्या तरी कशा? यामागे एक स्टोरी आहे त्याबाबत जाणून घेऊ.

Last Updated: December 06, 2025, 16:55 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Health Tips : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्तीसाठी तिळ सुपरफूड, रोज खाल्ल्याने आणखी होतील हे फायदे, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल