वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात गुंडांचं राज्य चालू देणार नसल्याचं त्यांनी ठणकावलंय. हत्येतील फरार आरोपींना बिलकूल सोडणार नसल्याचं फडणवीस म्हणालेयेत. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी फोनवर चर्चा केली असल्याचं त्यांनी म्हटलंय. जाणीवपूर्वक केस सीआयडीला दिली असल्याचं त्यांनी म्हटलंय. ज्यांना राजकारण करायचं त्यांना लखलाभ असल्याचं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर बोलणं टाळलंय.