खंडणी आणि सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास स्थानिक पोलीस ,सीआयडी आणि आता एसआयटीया तीन तपासी यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे.. आज एसआयटी या प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींची चौकशी करणार आहे..काल एसआयटी दाखल होताच सर्व वरीष्ठ अधिकारी यांची बैठक घेवून आत्तापर्यंत झालेला तपास या बाबतीत सर्व अपडेट घेण्यात आले.. एसआयटीच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. पहिल्यांदाच एसआयटी अटक असलेल्या सर्व आरोपींची चौकशी करणार असून फरार असलेल्या आरोप संदर्भातील काही धागेदोरे मिळतात का याचा शोध घेणार आहे..तर आज एसआयटी वाल्मिक कराडची चौकशी करण्याची शक्यता आहे.