
पुणे : प्रत्येक व्यक्तीकडे एखादी ना एखादी कला दडलेली असते. परंतु त्या कलेला योग्य दिशा, सातत्य आणि निसर्गाशी असलेले नाते मिळाले तर ती एक वेगळीच ओळख निर्माण करू शकते. पुण्यातील सहकारनगर परिसरात राहणारे गौतम वैष्णव हे असेच एक नाव. निसर्गाच्या सान्निध्यात दगडांच्या समतोलातून आकर्षक शिल्पनिर्मिती करणारी त्यांची रॉक बॅलन्सिंग ही कला आज देशभरात लोकप्रिय झाली आहे. या कलेला भारतात मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात गौतम यांचा मोठा वाटा असून, अनेकांना मानसिक स्थैर्याचा आणि निसर्गाशी बंध दृढ करण्याचा नवा मार्ग त्यांनी दाखवला आहे.
Last Updated: December 11, 2025, 15:02 ISTनाशिक : आजच्या तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देणारी एक कहाणी नाशिकमधून समोर आली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या आणि काही वर्षे नोकरी केलेल्या सक्लिन मिर्झा या तरुणाने वेळेवर आणि अपेक्षित प्रगती होत नसल्याचे पाहून हातची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. वडिलांनी सुरू केलेला राज मिसळचा व्यवसाय पुढे नेऊन सक्लिनने आज एक मोठे यश संपादन केले आहे.
Last Updated: December 11, 2025, 14:42 ISTपुणे : थंडीच्या दिवसात काहीतरी गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा अनेकांची होत असते. म्हणूनच आज आपण खेकडा भजी अगदी बाजारात मिळतात तशाच खुसखुशीत आणि चविष्ट पद्धतीने घरच्या घरी बनवणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सोपी रेसिपी.
Last Updated: December 11, 2025, 14:18 ISTनागपूर : नागपूर येथील तंत्रज्ञानप्रेमी तरुणाने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इंद्रप्रस्थनगर, भामटी येथील हितेन धरपुरे या अवघ्या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याने जगातील सर्वात लहान एआय-आधारित हवामान केंद्र तयार करून नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे लेआउटचा विद्यार्थी असलेल्या हितेनने तयार केलेले हे मिनी वेदर स्टेशन आकाराने जरी अतिशय लहान असले तरी कार्यक्षमतेत उत्तम आहे. तापमान, आर्द्रता, वायुदाब यांसारखे हवामानातील महत्त्वाचे घटक हे उपकरण रिअल टाइममध्ये मोजते आणि त्यावर प्रक्रिया करते. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने त्वरित विश्लेषणही करते.
Last Updated: December 11, 2025, 14:02 ISTबीड : बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांपासून दूर जात राजमा म्हणजेच घेवडा पिकाचा प्रयोग हाती घेतला असून, कमी क्षेत्रातही उत्तम उत्पन्न मिळत असल्याची माहिती मिळत आहे. राजमा हे स्वभावतः नायट्रोजन स्थिरीकरण करणारे पीक असल्याने जमिनीची सुपीकता वाढवणे, रासायनिक खतांचा खर्च कमी करणे आणि अल्प पाण्यातही पीक तगवणे या तिन्ही बाबींमध्ये ते अत्यंत फायदेशीर ठरत आहे. मुळांवरील राईझोबियम जिवाणू हवेतला नायट्रोजन थेट जमिनीत साठवतात, यामुळे जमिनीत नैसर्गिक सुपीकतेचा थर तयार होतो आणि पुढील पिकांनाही त्याचा फायदा मिळतो.
Last Updated: December 11, 2025, 13:23 IST