TRENDING:

कोल्हापूर टू बिहार विशेष रेल्वे धावणार, महाराष्ट्रात किती ठिकाणी थांबणार? असं असेल वेळापत्रक

Last Updated:

उन्हाळी सुटीच्या हंगामात उत्तर भारतात जाणाऱ्या बिहारी नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एक विशेष उपक्रम राबविला आहे. कोल्हापूरहून बिहारमध्ये असणाऱ्या कटिहारकडे जाणारी कोल्हापूर-कटिहार विशेष साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे सुरू होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर-कटीहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस
कोल्हापूर-कटीहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस
advertisement

मध्य रेल्वेने या विशेष गाडीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आवाहन केले आहे. उन्हाळी सुटीच्या कालावधीत (6 एप्रिल ते 27 एप्रिल) ही सेवा चालवली जाणार असून प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याचा विचार केला जाईल.

Weather Update : पुढील 24 तास महत्त्वाचे, राज्यात गारपिटीसह पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

advertisement

विशेष रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती:

View More

प्रवास सुरू होईल: कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून गाडी क्रमांक 01405 प्रत्येक रविवारी सकाळी 9:35 वाजता निघेल.

गंतव्य: ही गाडी बिहारमधील कटिहारपर्यंत पोहोचेल.

पोहोचण्याची वेळ: कोल्हापूरहून रवाना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी (मंगळवार) सकाळी 6:10 वाजता कटिहार येथे पोहोचेल.

परतीचा प्रवास:

परतीची गाडी: कटिहार-सांगली-कोल्हापूर एक्सप्रेस (गाडी क्र. 01406)

advertisement

प्रवासाची तारीख: 8 एप्रिलपासून 29 एप्रिलपर्यंत दर मंगळवारी परतीचा प्रवास सुरू होईल.

प्रवासाची वेळ: कटिहार स्थानकावरून सायंकाळी 6:10 वाजता निघून तिसऱ्या दिवशी (गुरुवार) दुपारी 3:35 वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल.

महत्वाचे थांबे:

या विशेष एक्सप्रेसमध्ये खालील प्रमुख स्थानकांवर थांबे असतील:

महाराष्ट्र: मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड

advertisement

मध्य भारत: भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर

उत्तर भारत: प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र (पटना), हाजीपूर, बरौनी, बेगुसराय, खगडिया, नौगचिया

बिहारी प्रवाशांसाठी मोठी सोय:

पश्चिम महाराष्ट्रात विविध कामासाठी राहणाऱ्या बिहारी नागरिकांसाठी बिहारच्या प्रमुख शहरांपर्यंत पोहोचण्याची रेल्वे सेवा ही दीर्घकालीन मागणी होती. या मागणीला प्रतिसाद देत मध्य रेल्वेने कोल्हापूरहून बिहारला जाणारी ही विशेष रेल्वे सुरू केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

प्रवाशांनी या विशेष सेवेला उत्तम प्रतिसाद दिल्यास ही गाडी कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा विचार केला जाईल. मध्य रेल्वेच्या या उपक्रमामुळे उन्हाळी प्रवास अधिक सोयीस्कर व आरामदायी होणार आहे. प्रवाशांनी आगाऊ तिकीट बुकिंग करून या विशेष एक्सप्रेसचा लाभ घ्यावा. बिहारला जाणाऱ्या आणि तिकडून परतणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठी बातम्या/Viral/
कोल्हापूर टू बिहार विशेष रेल्वे धावणार, महाराष्ट्रात किती ठिकाणी थांबणार? असं असेल वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल