मोठी बातमी : उल्हासनगरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ, ३० गाड्यांची तोडफोड, महिला लहान मुलांवर तलवारीने हल्ला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
उल्हासनगरमध्ये ७ ते ८ जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला आहे. त्यांनी महिला, लहान मुलं आणि पुरुषांवर तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला केला.
उल्हासनगर : मुंबईतील उल्हासनगरमध्ये ७ ते ८ जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला आहे. जवळपास २५ ते ३० गाड्यांची तोडफोड करून महिला, लहान मुलं आणि पुरुषांवर तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना समोर येत आहे.
टोळक्याच्या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलिसांची मोठी कुमक दाखल झाली असून पोली आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
पाचच्या सुमारास सात ते मुले मुलांनी अचानक धुसगूस घालायला सुरूवात केली. त्यांनी जवळपास ३०० मीटरवरील सर्व गाड्या फोडल्या. यात अनेकांच्या दुचाकी, चारचाकी तसेच रिक्षांचे नुकसान झाले आहे.
Location :
Ulhasnagar,Thane,Maharashtra
First Published :
June 10, 2025 9:07 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
मोठी बातमी : उल्हासनगरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ, ३० गाड्यांची तोडफोड, महिला लहान मुलांवर तलवारीने हल्ला


