advertisement

Health Tips : बदलत्या हवामानानुसार होतात तब्येतीवर परिणाम, दिनचर्येतले बदल ठरतील महत्त्वाचे

Last Updated:

जीवनशैली आणि बाहेरच्या वातावरणाचे परिणाम या दोन्हीमुळे शरीर आजारी होतं. औषधोपचारांमुळे आजारांचे परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करत असलात तरी, मूळ कारण समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्व आजारांचं मूळ जीवनशैलीत असतं. पाहूयात कोणते बदल केले तर तब्येत चांगली राहिल.

News18
News18
मुंबई : काही भागात थंडीचा कडाका वाढलाय. काही भागात काल परवा पाऊस झाला. बदलत्या हवामानाचा काहींना त्रास होतो. बदलतं हवामान हे आजाराचं एक कारण आहे, पण त्याचं मूळ कारण आपल्या शरीरात असतं
जीवनशैली आणि बाहेरच्या वातावरणाचे परिणाम या दोन्हीमुळे शरीर आजारी होतं. औषधोपचारांमुळे आजारांचे परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करत असलात तरी, मूळ कारण समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्व आजारांचं मूळ जीवनशैलीत असतं. पाहूयात कोणते बदल केले तर तब्येत चांगली राहिल.
चुकीच्या जीवनशैलीचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो आणि यामुळे रोगांचा प्रसार वाढतो. कधीकधी, शरीरात आधीच एखादा आजार हात पाय पसरत असतो, पण त्याची लक्षणं लगेच दिसून येत नाहीत. यासाठी अष्टांग योगात वर्णन केलेल्या आरोग्य तत्त्वांप्रमाणे जीवनशैलीत बदल करून शरीर निरोगी ठेवता येणं शक्य आहे.
advertisement
अष्टांग हृदयमधे कोणतंही औषध सांगितलं जात नाही, तर यामुळे जीवन जगण्याची पद्धत शिकवली जाते. यासाठी आपला दिवस कसा सुरू करायचा ते शिकूया.
कोमट पाणी - निरोगी शरीराला औषध किंवा व्यायामाची आवश्यकता नाही; फक्त सूर्योदयापूर्वी जागं होणं पुरेसं आहे. लवकर उठणं किती फायदेशीर आहे हे निसर्ग आपल्याला शिकवतो.  सकाळी उठल्यावर सर्वात आधी जे करायला हवं ते म्हणजे रात्री साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढणं. यासाठी कोमट पाणी प्या आणि विषारी पदार्थ बाहेर काढा. सकाळी कोमट पाणी प्यायल्यानं पचनक्रिया उत्तेजित करते आणि भूक सुधारते.
advertisement
मौखिक स्वच्छता - कोणतंही अन्न खाण्यापूर्वी तोंडाची स्वच्छता आवश्यक आहे. तोंड आणि जीभ स्वच्छ करणं हे केवळ सौंदर्याबद्दल नाही तर ते थेट पोटाशी देखील जोडलेलं आहे. तुमच्या जिभेवर आणि तोंडात जंतू साचल्यानं पोटाचे अनेक आजार होऊ शकतात.
advertisement
याव्यतिरिक्त, तोंड आणि जीभ स्वच्छ करण्यासाठी ऑईल पुलिंग हा चांगला पर्याय आहे. यामुळे दात मजबूत होतात आणि पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.
व्यायाम - जेवण करण्यापूर्वी हलका व्यायाम करणंही शरीरासाठी आवश्यक आहे. थोड्याशा व्यायामानं शरीराला जास्त थकवा येत नाही, उलट नवीन ऊर्जा मिळतो. यामुळे शरीराच्या प्रत्येक भागाला रक्त आणि ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो. याव्यतिरिक्त, तहान लागल्यावर भरपूर पाणी प्या आणि अन्न औषध म्हणून खा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : बदलत्या हवामानानुसार होतात तब्येतीवर परिणाम, दिनचर्येतले बदल ठरतील महत्त्वाचे
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement