KDMC Election 2025: 27 गावांना पाहिजे स्वतंत्र कारभार! केडीएमसी इलेक्शन लादत असल्याची तक्रार

Last Updated:

KDMC Election 2025: या वर्षाच्या शेवटी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची (केडीएमसी) निवडणूक होणार आहे. त्यासाठी महापालिका पूर्व तयारी करत आहे.

KDMC Election 2025: 27 गावांना पाहिजे स्वतंत्र कारभार! केडीएमसी इलेक्शन लादत असल्याची तक्रार
KDMC Election 2025: 27 गावांना पाहिजे स्वतंत्र कारभार! केडीएमसी इलेक्शन लादत असल्याची तक्रार
कल्याण : यावर्षाच्या (2025) शेवटी मुंबईसह लगतच्या अनेक उपनगरांमध्ये महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचाही (केडीएमसी) समावेश आहे. त्यामुळे महापालिका सध्या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात व्यग्र आहे. पालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. केडीएमसी हद्दीतील 27 गावांनी निवडणुकीत सहभागी होण्यास विरोध केला आहे. आमच्यावर विनाकारण निवडणूक लादली जात असल्याची, हरकत 27 गावांतील रहिवाशांनी नोंदविली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी गुरुवारपर्यंत (4 सप्टेंबर) मुदत देण्यात आली होती. शेवटच्या दिवशी 264 हरकती जमा झाल्या. 27 गावांतून 3 हजार 500 पेक्षा जास्त हरकती जमा झाल्या असून एका व्यक्तीच्या नावे 200 पेक्षा हरकती आहेत.
advertisement
याचिकाकर्ते संदीप पाटील यांच्या मते, प्रभाग रचना करताना लोकसंख्येचा निकष पाळला गेलेला नाही. पॅनल पद्धतीला विरोध करणारी याचिका न्यायप्रविष्ट आहे. 27 गावांनी प्रभाग रचनेला विरोध आहे. शिवाजीनगर आणि वालधुनी हे परिसर राजकीय हेतूने कल्याण पश्चिमशी जोडले गेले आहेत. हे परिसर कल्याण पूर्वेशी जोडले जावेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी सगळ्यात प्रथम हरकत नोंदविली होती. त्यांनी कायदेशीर पद्धतीने नोटीस देत हरकत घेतली. प्रभाग रचना ही उत्तरेकडून होणे अपेक्षित आहे. यानुसार, प्रभाग रचना टिटवाळ्यातून होणे अपेक्षित आहे मात्र, ती उंबर्डे सापर्डे येथून करण्यात आली आहे.
advertisement
मनसेनेही मैदनात
27 गाव संघर्ष समितीचे सत्यवान म्हात्रे म्हणाले की, 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा प्रश्न सुप्रिम कोर्टात गेलेला आहे. या 27 गावांना महापालिकेत राहायचे नाही. त्यांच्यावर महानगरपालिकेची निवडणूक जबरदस्तीने लादली जात आहे.
दरम्यान, हरकती सूचनांवर 5 ते 12 सप्टेंबरदरम्यान सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. त्यासाठी विशेष अधिकारी नेमला गेला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
KDMC Election 2025: 27 गावांना पाहिजे स्वतंत्र कारभार! केडीएमसी इलेक्शन लादत असल्याची तक्रार
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement