IPS Anjana Krishna: अमोल मिटकरी यांना माफी का मागावी लागली? राष्ट्रवादीचे नेते का संतापले? नेमकं काय घडलं?

Last Updated:

IPS Anjana Krishna: प्रशासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी अजित पवार यांची कृती चुकीची मानून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनी त्यांना जोरदार लक्ष्य केले. त्यानंतर आयपीएस अधिकारी कृष्णा याच कशा दोषी आहेत? हे दाखविण्याची राष्ट्रवादीत स्पर्धा सुरू झाली.

अंजना कृष्णा-अजित पवार-अमोल मिटकरी
अंजना कृष्णा-अजित पवार-अमोल मिटकरी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांची प्रतिमा ठरवून बदलण्याचा प्रयत्न केला गेला. रांगडेपणासाठी, कठोर भाषेसाठी ओळखणाऱ्या अजित पवारांच्या स्वभावात आता नम्रता, विनयशीलता आली आहे, असे ठसविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. पण 'स्वभावाला औषध नसते' ही म्हण अजित पवार यांनी काही महिन्यातच खरी करून दाखवली. परिविक्षाधीन अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन करून 'आप की इतनी डेअरिंग हो गयी क्या?' असे मग्रुर भाषेत अजित पवार यांनी विचारले. नुकत्याच सेवेत रूजू झालेल्या अधिकाऱ्याला प्रोत्साहान द्यायचे सोडून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. त्यापुढे जाऊन राष्ट्रवादीतील 'चहापेक्षा किटली गरम' स्वभावाच्या प्रवक्ते नामक पदाधिकाऱ्यांनी सर्वोच्च नेत्याला खूष करण्यासाठी किंबहुना दादांच्या बचावासाठी कुणी थेट यूपीएससीला पत्र लिहिले तर कुणी थेट कृष्णा यांच्या कर्तव्यनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रशासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी अजित पवार यांची कृती चुकीची मानून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनी त्यांना जोरदार लक्ष्य केले. त्यानंतर आयपीएस अधिकारी कृष्णा याच कशा दोषी आहेत? हे दाखविण्याची राष्ट्रवादीत स्पर्धा सुरू झाली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अंजना कृष्णा यांच्या अंगावर वर्दी नाही तसेच त्या खासगी गाडीतून आल्याचे सांगत त्यांचे वर्तन उद्दामपणाचे होते, असे म्हणत अजित पवार यांच्याप्रति आपली निष्ठा दाखविण्याचा प्रयत्न केला. कुर्डू गावात जाऊन तेथील पक्षाच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या संपूर्ण पत्रकार परिषदेत आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कशा चुकीच्या वागल्या, हेच दाखविण्याचा प्रयत्न उमेश पाटील यांनी केला. दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनीही राजकीय वेळ साधत यूपीएससीला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या जात प्रमाणपत्रासह त्यांची इतरही शैक्षणिक कागदपत्रे तपासण्यात यावीत, अशी मागणी केली.
advertisement
राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फौज अजित पवार यांच्या बचावासाठी उतरली खरी. परंतु अजित पवार यांची अंजना कृष्णा यांना धमकावतानाची पूर्ण ध्वनीचित्रफीत संपूर्ण देशात गेल्याने पक्षावर चौफेर टीका झाली. कायद्याचे धडे देणारे अजित पवार हेच जर अधिकाऱ्याला कायद्याची अंमलबजावणी करताना रोखत असतील तर प्रशासनावर नेमकी कसली पकड मानायची? असे सवाल उपस्थित होऊ लागली. विरोधकांनी देखील अजित पवार यांना त्यांच्या स्वभावावरून आणि अधिकाऱ्यांच्या नेहमी दरडावण्याच्या सुरात बोलण्यावरून सुनावले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅकफूटला गेला.
advertisement

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी अमोल मिटकरी यांना खडे बोल सुनावले

याप्रकरणी अधिक बोलून नाचक्की होण्यापेक्षा प्रकरणावर पदडा टाकलेला बरा असे म्हणून अजित पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. हस्तक्षेप करण्यासंदर्भात कोणताही प्रयत्न नव्हता. पोलिसांबद्दल मला नेहमीच आदर आहे, असे म्हणून त्यांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी करून एकप्रकारे त्यांच्यावर दबाव आणला. तसेच कर्तव्य कठोर अधिकाऱ्यांना कारवाई केली तर काय होऊ शकते यासंदर्भात सूचक संदेश दिला. एकीकडे पक्षाची बदनामी होत असताना आणि अजित पवार यांची प्रतिमा मलिन होत असताना मिटकरी यांच्या ट्विटच्या रूपाने त्यात अधिकच भर पडली होती. त्यामुळे मिटकरी यांच्या हेतूवर पक्षातील नेते चांगलेच संतापले.
advertisement
अमोल मिटकरी यांना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी खडे बोल सुनावले. तुमच्या ट्विटमधून पोलिसांच्या प्रमाणिकपणावर आणि कर्तव्य निष्ठेवर शंका उपस्थित होत असल्याने केलेले ट्विट माघारी घेऊन त्यावर स्पष्टीकरण द्या, असे आदेश त्यांना दिले गेले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आदेश शिरसावंद्य मानून मिटकरी यांनीही ट्विट माघारी घेऊन आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IPS Anjana Krishna: अमोल मिटकरी यांना माफी का मागावी लागली? राष्ट्रवादीचे नेते का संतापले? नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Nagar Parishad Election : ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षानं मैदान मारलं
ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा
  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

  • ह्याला म्हणतात कमबॅक! पराभवानंतर राजकारणातून संपला म्हणाले, पण पठ्ठ्याने ९ वर्षा

View All
advertisement