'हा नवा भारत आहे, आम्हाला शांत बसवण्याचे दिवस संपले'; एस.जयशंकर यांचा सणसणीत इशारा, पाकला मदत करण्यावरून संतापले

Last Updated:

S Jayashankar: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाश्चात्त्य देशांना सणसणीत इशारा दिला आहे की, पाकिस्तानला IMF मार्फत मदत देऊन भारताला शांत बसवण्याचे दिवस संपले आहेत. हा नवा भारत असून, आमच्यासाठी आमच्या लोकांची सुरक्षा सर्वोच्च आहे,असे ते म्हणाले.

News18
News18
नवी दिल्ली: जर पाश्चिमात्य देशांना असे वाटत असेल की, भारतीय नागरिक हल्ल्यांच्या सावटाखाली असताना ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) माध्यमातून पाकिस्तानला आर्थिक मदत देऊन भारताला शांत बसण्याचा आदेश देऊ शकतील. तर त्यांनी हे समजून घ्यावे की भारतावरील त्यांच्या नियंत्रणाचे दिवस आता संपले आहेत. हा नवा भारत आहे. आमच्यासाठी आमच्या लोकांची सुरक्षा इतर कशापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे, अशा अत्यंत कठोर शब्दांत भाजपचे नेते जयशंकर यांनी संबंधित देशांना सुनावले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली असून भारताच्या बदललेल्या आणि अधिक कणखर भूमिकेचा स्पष्ट संदेश संपूर्ण जगभरात पोहोचला आहे.
जयशंकर यांनी आपल्या विधानातून स्पष्ट केले आहे की, भारताच्या सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या कोणत्याही कृतीला भारत खपवून घेणार नाही. विशेषतः पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे मदत करून भारतावर दबाव आणण्याचे पाश्चात्त्य देशांचे प्रयत्न आता यशस्वी होणार नाहीत, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. हा नवा भारत आहे या त्यांच्या उद्गारातून भारताचा वाढता आत्मविश्वास आणि आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याची कटिबद्धता दिसून येते.
advertisement
वक्तव्याची पार्श्वभूमी आणि संदर्भ
पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून वेळोवेळी मोठ्या कर्जाच्या स्वरूपात मदत घेत आला आहे. भारताचा सातत्याने असा आक्षेप राहिला आहे की, पाकिस्तानला मिळणारी ही आर्थिक मदत अनेकदा भारतविरोधी कारवाया, दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी किंवा संरक्षणसिद्धता वाढवण्यासाठी वापरली जाते. अशा परिस्थितीत जेव्हा भारतीय सीमेवर किंवा भारताच्या भूभागावर दहशतवादी हल्ले होत असतात किंवा भारतीय नागरिक अशा हल्ल्यांचे बळी ठरत असतात. तेव्हा पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देणे हे भारताच्या चिंतेत भर टाकणारे ठरते.
advertisement
जयशंकर यांचे हे वक्तव्य अशाच एका पार्श्वभूमीवर आलेले आहे जेव्हा IMF कडून पाकिस्तानला मोठी मदत देण्यास मंजुरी मिळाली आहे. ही मदत अशा वेळी दिली गेली आहे जेव्हा पाकिस्तान भारताच्या सीमेवर कुरापती करत आहे.
मराठी बातम्या/देश/
'हा नवा भारत आहे, आम्हाला शांत बसवण्याचे दिवस संपले'; एस.जयशंकर यांचा सणसणीत इशारा, पाकला मदत करण्यावरून संतापले
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement