Honey Warm Water : मध गरम पाण्यात टाकून का पिऊ नये, असं मध प्यायल्याने काय होतो परिणाम?

Last Updated:
Honey And Warm Water Effects : अनेक जण सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्यात मध टाकून पितात, कित्येकांच्या रूटिनचा हा भाग आहे. म्हणे यामुळे वजन कमी होतं. पण डॉक्टर मात्र गरम पाण्यात टाकून न पिण्याचा सल्ला देतात.
1/5
आजकाल वजन कमी करणं, डिटॉक्स, पचन सुधारावं यासाठी अनेक लोक सकाळी उठताच गरम पाण्यात मध टाकून पितात.  सोशल मीडियावर, युट्युब व्हिडीओंमध्ये आणि व्हॉट्सॲप फॉरवर्डमध्ये हा उपाय खूप लोकप्रिय आहे. मात्र आयुर्वेद आणि काही आधुनिक संशोधनानुसार गरम पाण्यात मध टाकून पिणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं.
आजकाल वजन कमी करणं, डिटॉक्स, पचन सुधारावं यासाठी अनेक लोक सकाळी उठताच गरम पाण्यात मध टाकून पितात.  सोशल मीडियावर, युट्युब व्हिडीओंमध्ये आणि व्हॉट्सॲप फॉरवर्डमध्ये हा उपाय खूप लोकप्रिय आहे. मात्र आयुर्वेद आणि काही आधुनिक संशोधनानुसार गरम पाण्यात मध टाकून पिणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं.
advertisement
2/5
आयुर्वेदात मध म्हणजे मधू हा एक औषधी पदार्थ मानला जातो पण तो गरम पदार्थात मिसळू नये, असा नियमही आयुर्वेदात सांगितला आहे. आयुर्वेदानुसार गरम केल्यावर मधाचे गुणधर्म बदलतात. गरम पाण्यात मध टाकल्यास तो पचायला जड होतो आणि दीर्घकाळ सेवन केल्यास आम म्हणजे शरीरात विषद्रव्य साचू शकतात, असं आयुर्वेद सांगतो.
आयुर्वेदात मध म्हणजे मधू हा एक औषधी पदार्थ मानला जातो पण तो गरम पदार्थात मिसळू नये, असा नियमही आयुर्वेदात सांगितला आहे. आयुर्वेदानुसार गरम केल्यावर मधाचे गुणधर्म बदलतात. गरम पाण्यात मध टाकल्यास तो पचायला जड होतो आणि दीर्घकाळ सेवन केल्यास आम म्हणजे शरीरात विषद्रव्य साचू शकतात, असं आयुर्वेद सांगतो.
advertisement
3/5
गरम पाण्यात मध टाकल्यास तो पचायला जड होतो आणि दीर्घकाळ सेवन केल्यास शरीरात विषद्रव्य साचू शकतात, असं आयुर्वेद सांगतो. गरम मधामुळे तयार होणारा आम सांधेदुखी, त्वचेचे विकार, गॅस, अॅसिडिटी, थकवा, वजन कमी न होता उलट वाढ यास कारणीभूत ठरू शकतो.
गरम पाण्यात मध टाकल्यास तो पचायला जड होतो आणि दीर्घकाळ सेवन केल्यास शरीरात विषद्रव्य साचू शकतात, असं आयुर्वेद सांगतो. गरम मधामुळे तयार होणारा आम सांधेदुखी, त्वचेचे विकार, गॅस, अॅसिडिटी, थकवा, वजन कमी न होता उलट वाढ यास कारणीभूत ठरू शकतो.
advertisement
4/5
आधुनिक विज्ञानानुसार मधामध्ये एन्झाइम्स, अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात.  उच्च तापमानात हे घटक नष्ट होतात, त्याचं पौष्टिक मूल्य कमी होतं. म्हणजेच गरम पाण्यात मध घातल्यावर त्याचा आरोग्यदायी फायदा कमी होतो.
आधुनिक विज्ञानानुसार मधामध्ये एन्झाइम्स, अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात.  उच्च तापमानात हे घटक नष्ट होतात, त्याचं पौष्टिक मूल्य कमी होतं. म्हणजेच गरम पाण्यात मध घातल्यावर त्याचा आरोग्यदायी फायदा कमी होतो.
advertisement
5/5
अनेक लोकांचा गैरसमज आहे की गरम पाणी आणि मध म्हणजे वजन कमी.  प्रत्यक्षात: गरम पाणी चालू शकते पण त्यात मध टाकण्याची गरज नाही. गरम मधामुळे मेटाबॉलिझम सुधारत नाही उलट पचनावर ताण येऊ शकतो.
अनेक लोकांचा गैरसमज आहे की गरम पाणी आणि मध म्हणजे वजन कमी.  प्रत्यक्षात: गरम पाणी चालू शकते पण त्यात मध टाकण्याची गरज नाही. गरम मधामुळे मेटाबॉलिझम सुधारत नाही उलट पचनावर ताण येऊ शकतो.
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement