उपाशीपोटी सकाळी फळे खावीत का? जाणून घ्या आहार तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:
वर्षभर मिळणाऱ्या फळांचे नियमित सेवन केल्यामुळे वेगवेगळी जीवनसत्त्वे शरीरास मिळत असतात.
1/7
 सकाळी उठल्यानंतर बऱ्याच जणांना भूक लागते आणि मग अशावेळी फळे, दूध, चहा किंवा नाश्त्याचे पदार्थ यापैकी काहीही आपल्याकडून खाल्ले जाते. तर बरेच जण सकाळी उठल्यावर मुद्दाम तब्येतीसाठी म्हणून पण फळांचे सेवन करत असतात. पण उपाशी पोटी फळे खाणे खरंच शारीरिक दृष्ट्या चांगले असते का? हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरच्या</a> आहार तज्ज्ञ स्नेहल पै यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सकाळी उठल्यानंतर बऱ्याच जणांना भूक लागते आणि मग अशावेळी फळे, दूध, चहा किंवा नाश्त्याचे पदार्थ यापैकी काहीही आपल्याकडून खाल्ले जाते. तर बरेच जण सकाळी उठल्यावर मुद्दाम तब्येतीसाठी म्हणून पण फळांचे सेवन करत असतात. पण उपाशी पोटी फळे खाणे खरंच शारीरिक दृष्ट्या चांगले असते का? हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरच्या</a> आहार तज्ज्ञ स्नेहल पै यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
2/7
वर्षभरात वेगवेगळ्या ऋतुमानानुसार बाजारात वेगवेगळी फळे विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. या आणि वर्षभर मिळणाऱ्या फळांचे नियमित सेवन केल्यामुळे वेगवेगळी जीवनसत्त्वे शरीरास मिळत असतात. त्यामुळे फळे ही शरीरासाठी फळे लाभदायकच ठरत असतात. तर सकाळी उपाशीपोटी अशी फळे खाणे हे देखील आरोग्यदायीच असते, असे आहार तज्ज्ञ स्नेहल पै यांनी सांगितलं आहे.
वर्षभरात वेगवेगळ्या ऋतुमानानुसार बाजारात वेगवेगळी फळे विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. या आणि वर्षभर मिळणाऱ्या फळांचे नियमित सेवन केल्यामुळे वेगवेगळी जीवनसत्त्वे शरीरास मिळत असतात. त्यामुळे फळे ही शरीरासाठी फळे लाभदायकच ठरत असतात. तर सकाळी उपाशीपोटी अशी फळे खाणे हे देखील आरोग्यदायीच असते, असे आहार तज्ज्ञ स्नेहल पै यांनी सांगितलं आहे.
advertisement
3/7
रात्रीच्या जेवणानंतर सकाळी काही खाईपर्यंत बराच काळ आपल्या पोटात काही न गेल्यामुळे सकाळी खूप भूक लागू शकते. मात्र इतका वेळ काही न खाता राहिल्यामुळे पचनक्रिया देखील मंदावलेली असते. त्यामुळे अशावेळी पचनास जड असे पदार्थ आपण खाऊ शकत नाही. म्हणूनच रिकाम्या पोटी फळे खाणे हा उत्तम उपाय असू शकतो.
रात्रीच्या जेवणानंतर सकाळी काही खाईपर्यंत बराच काळ आपल्या पोटात काही न गेल्यामुळे सकाळी खूप भूक लागू शकते. मात्र इतका वेळ काही न खाता राहिल्यामुळे पचनक्रिया देखील मंदावलेली असते. त्यामुळे अशावेळी पचनास जड असे पदार्थ आपण खाऊ शकत नाही. म्हणूनच रिकाम्या पोटी फळे खाणे हा उत्तम उपाय असू शकतो.
advertisement
4/7
फळे ही पचायला देखील हलकी असतात. त्याचबरोबर ती अनेक पोषकतत्वांनी युक्त असतात. हीच पोषकतत्वे रिकाम्या पोटी शरीराला अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात. त्यामुळे उपाशीपोटी फळे खाणे कधीही चांगलेच, असे स्नेहल पै यांनी सांगितलं आहे.
फळे ही पचायला देखील हलकी असतात. त्याचबरोबर ती अनेक पोषकतत्वांनी युक्त असतात. हीच पोषकतत्वे रिकाम्या पोटी शरीराला अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात. त्यामुळे उपाशीपोटी फळे खाणे कधीही चांगलेच, असे स्नेहल पै यांनी सांगितलं आहे.
advertisement
5/7
सकाळी उपाशी पोटी फळे खाणे कधीही चांगलेच मात्र सकाळच्या नाष्ट्या ऐवजी फक्तच फळे खाणे अयोग्य आहे. कारण सकाळच्या वेळी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते आणि ती फक्त फळांच्या सेवनाने पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच दिवसभर थकवा जाणवून सारखी भूक लागू शकते. अशावेळी फळांसोबत उकडलेली अंडी किंवा मोड आलेली कडधान्य खावीत, असेही पै यांनी सांगितलं.
सकाळी उपाशी पोटी फळे खाणे कधीही चांगलेच मात्र सकाळच्या नाष्ट्या ऐवजी फक्तच फळे खाणे अयोग्य आहे. कारण सकाळच्या वेळी आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते आणि ती फक्त फळांच्या सेवनाने पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच दिवसभर थकवा जाणवून सारखी भूक लागू शकते. अशावेळी फळांसोबत उकडलेली अंडी किंवा मोड आलेली कडधान्य खावीत, असेही पै यांनी सांगितलं.
advertisement
6/7
रात्रीच्या जेवणानंतर बऱ्याच जणांना फळे खाण्याची सवय असते. मात्र रात्री झोपण्याआधी, जेवणासोबत किंवा जेवणाला नंतर लगेच फळे खाऊ नयेत. ज्यांना अ‍ॅसिडिटीचा खूप त्रास होत असतो त्यांनी देखील सकाळी उपाशीपोटी फळे खाऊ नयेत. सकाळी ऐवजी अशा लोकांनी दोन जेवणांच्यामध्ये फळे खावीत. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनीही गोड फळे सकाळी उपाशीपोटी खाणे टाळावे, असे स्नेहल पै सांगतात.
रात्रीच्या जेवणानंतर बऱ्याच जणांना फळे खाण्याची सवय असते. मात्र रात्री झोपण्याआधी, जेवणासोबत किंवा जेवणाला नंतर लगेच फळे खाऊ नयेत. ज्यांना अ‍ॅसिडिटीचा खूप त्रास होत असतो त्यांनी देखील सकाळी उपाशीपोटी फळे खाऊ नयेत. सकाळी ऐवजी अशा लोकांनी दोन जेवणांच्यामध्ये फळे खावीत. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनीही गोड फळे सकाळी उपाशीपोटी खाणे टाळावे, असे स्नेहल पै सांगतात.
advertisement
7/7
एकंदरीत सकाळी उपाशी पोटी फळे खाणे हे योग्य असले, तरी शरीरास त्रासदायक ठरणारी आम्लयुक्त, जास्त गोड अशी फळे खाऊ नयेत. अन्यथा त्याचे उलट परिणाम भोगावे लागू शकतात. (साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी)
एकंदरीत सकाळी उपाशी पोटी फळे खाणे हे योग्य असले, तरी शरीरास त्रासदायक ठरणारी आम्लयुक्त, जास्त गोड अशी फळे खाऊ नयेत. अन्यथा त्याचे उलट परिणाम भोगावे लागू शकतात. (साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी)
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement