विदर्भात आज बरसणार हलक्या सरी; उद्यापासून जोरदार पावसाची शक्यता

Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस विदर्भात पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. विविध जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
1/5
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. विदर्भातही 4 दिवस काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी वातावरण कोरडे होते. विश्रांतीनंतर आता पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. विदर्भातही 4 दिवस काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा झाला. तर अनेक ठिकाणी वातावरण कोरडे होते. विश्रांतीनंतर आता पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/5
विदर्भातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावतीसह सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मेघर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
विदर्भातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावतीसह सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मेघर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
advertisement
3/5
आज 18 सप्टेंबर पासूनच विदर्भात तुरळक प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे. 19 आणि 20 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल. 20 सप्टेंबरसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
आज 18 सप्टेंबर पासूनच विदर्भात तुरळक प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात होणार आहे. 19 आणि 20 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल. 20 सप्टेंबरसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
advertisement
4/5
विदर्भात 20 सप्टेंबरनंतर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांना पावसाची आस होती. मात्र, पाऊस न आल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.
विदर्भात 20 सप्टेंबरनंतर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांना पावसाची आस होती. मात्र, पाऊस न आल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली.
advertisement
5/5
दरम्यान, कपाशी पिकाला आता मध्यम स्वरूपाच्या पावसाची गरज असल्याचं कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या 19 आणि 20 सप्टेंबरला होणाऱ्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत.
दरम्यान, कपाशी पिकाला आता मध्यम स्वरूपाच्या पावसाची गरज असल्याचं कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या 19 आणि 20 सप्टेंबरला होणाऱ्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement