राज्यात पुन्हा थंडीचा जोर, नागपुरात पारा घसरला, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
21 जानेवारीला राज्यात कोरडे हवामान असणार आहे. काही भागांतील किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढलाय. विदर्भात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील वातावरणात पुन्हा बदल झालेले दिसून येत आहे. राज्यात सर्व ठिकाणी दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असताना आता तुरळक ठिकाणी थंडीचा जोर वाढलाय. 21 जानेवारीला विदर्भात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मुंबई वगळता पुणे आणि इतर ठिकाणी सुद्धा किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात 21 जानेवारीला धुक्यासह अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक किमान तापमानाची नोंद आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे.
advertisement
21 जानेवारीला पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे पुणेकरांना सकाळच्या वेळी हलकी थंडी जाणवण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत किमान तापमानात वाढ होत जाणार आहे.
advertisement
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 जानेवारीला निरभ्र आकाश असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात देखील काहीशी घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये 21 जानेवारीला दुपारी किंवा सायंकाळी अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. नाशिक मधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिक मधील किमान तापमानात देखील काहीशी घट झाली आहे. पुढील काही दिवसांत नाशिकमधील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 21 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूर मध्ये सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढतांना दिसून येत आहे. विदर्भात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, मुंबई मध्ये उकाडा कायम आहे. वातावरणात सतत बदल होत असल्याने नागरिकांनी आरोग्याची व शेतकऱ्यांनी हरभरा आणि गहू या पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 20, 2025 7:54 PM IST

