Heat Wave : घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करा! विदर्भातील 6 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, पुण्यात काय स्थिती?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
राज्यामध्ये उष्णता सातत्याने वाढत आहे. विदर्भातील तब्बल सहा जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबई : राज्यामध्ये उष्णता सातत्याने वाढत आहे. विदर्भातील तब्बल सहा जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती आणि अकोला या सहा जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असणार आहे. तर मुंबई आणि कोकणातील जिल्ह्यांमधील नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असून कमाल तापमान खाली आले आहे. पाहुयात 15 मार्चला राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आल्हाददायक वातावरण राहणार असून ढगाळ आकाशासह कमाल तापमान हे 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरामध्ये उष्णतेचे चटके चांगलेच बसायला सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये पुढील 24 तासांमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. तर कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची देखील शक्यता आहे. कोल्हापूरमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
तर मराठवाड्यामध्ये सकाळच्या वेळी काहीसे धुके राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असून किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढे असेल. उत्तर महाराष्ट्रातही सकाळच्या वेळी धुके राहण्याची शक्यता असून नाशिकमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस एवढे असेल तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे असेल. नागपूरमध्ये आज हिटवेव असल्याचं पाहायला मिळालं तर 15 मार्चला देखील नागपूरमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत असणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 14, 2025 8:48 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Heat Wave : घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करा! विदर्भातील 6 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, पुण्यात काय स्थिती?

