मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, छत्रपती संभाजीनगरमध्येही तापमानात घट, पाहा हवामान अंदाज
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
राज्यातील तापमानात सातत्याने घट आणि वाढ होताना दिसून येत आहे. दोन दिवस आधी मुंबईतील तापमानाचा पारा वाढलेला दिसून येत होता. आता त्यात काहीशी घट झालेली पाहायला मिळत आहे.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील तापमानात सातत्याने घट आणि वाढ होताना दिसून येत आहे. दोन दिवस आधी मुंबईतील तापमानाचा पारा वाढलेला दिसून येत होता. आता त्यात काहीशी घट झालेली पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र कोरडे वातावरण असून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्वच भागांत आता उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली. 10 फेब्रुवारीला राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील पाहुयात.
advertisement
10 फेब्रुवारीला राज्यात सर्वत्र कोरडे वातावरण असणार आहे. काही भागांतील तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे.
मुंबईतील तापमानात काहीशी घट बघायला मिळत आहे. 10 फेब्रुवारीला मुंबईमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
advertisement
पुण्यातील तापमान गेले काही दिवस स्थिर असल्याचे बघायला मिळत आहे. 10 फेब्रुवारीला पुण्यामध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
नाशिकमधील किमान तापमानात काहीशी घट झालेली दिसून येत आहे. 10 फेब्रुवारीला नाशिकमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
नागपूरमधील तापमानात देखील काहीशी घट झालेली दिसून येत आहे. 10 फेब्रुवारीला नागपूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
advertisement
राज्यातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहे. मुंबईतील तापमानात घट झाली आहे तर पुण्यातील तापमान स्थिर असल्याचे दिसून येत आहे. तापमानात सतत बदल होत असल्याने विविध ठिकाणी आरोग्याची समस्या निर्माण होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 09, 2025 7:09 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, छत्रपती संभाजीनगरमध्येही तापमानात घट, पाहा हवामान अंदाज

