IND vs SA : ना पाऊस, ना वादळ चौथा टी20 सामना का रद्द झाला? बीसीसीआयवर मोठी नामुष्की
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लखनऊच्या मैदानावर पार पडणारा चौथा टी20 सामना रद्द करण्यात आला आहे. हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघाना मोठा फटका बसला आहे.कारण भारताला मालिकेत आघाडी घेण्याची संधी होती.
India vs South Africa : लखनऊच्या मैदानावर पार पडणारा चौथा टी20 सामना रद्द करण्यात आला आहे. हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघाना मोठा फटका बसला आहे.कारण भारताला मालिकेत आघाडी घेण्याची संधी होती,तर साऊथ आफ्रिकेकडे बरोबरी साधण्याची संधी होती. पण अखेर हा सामना रद्द झाला आहे. पण मैदानात ना पाऊस पडला आहे, ना वादळ आलं आहे,त्यामुळे असा कसा सामना रद्द झाला? असा प्रश्न चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
खरं तर चौथ्या सामन्याच्या टॉसच्या आधीपासून मैदानात दाट धूके होते.हे धूके इतके दाट होते की समोरचा माणूस देखील दिसत नाही.त्यामुळे धुके कमी होतील याची वाट पाहिली जात होती. या दरम्यान साधारण पाच वेळा 6.30 पासून ते 9.00 वाजेपर्यंत मैदानात इन्स्पेक्सन करण्यात आलं.त्यानंतरही मैदानातली परिस्थिती बदलत नसल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला होता.
advertisement
बीसीसीआयची गंभीर चूक
खरं तर टी20 वर्ल्ड कप 2026 ला येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून सूरूवात होणार आहे. या स्पर्धेला अजून जवळपास एक महिना उरला आहे.त्यामुळे सर्वच संघ मैदानात कसून सराव करतायत. टीम इंडियाजवळ या स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी 10 सामने होते. त्यातले तीन सामने पार पडले आहे. आज चौथा सामना आहे. पण हा सामना रद्द करण्यात आला आहे.. या सगळ्या गोष्टीला बीसीसीआय कारणीभूत ठरली आहे.
advertisement
लखनऊमध्ये थंडीच्या महिन्यात दाट धुके असतात याची कल्पना बीसीसीआयला होती. तरी देखील थंडीच्या महिन्यात लखनऊमध्ये सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजनामुळे लखनऊच्या मैदानात सध्या प्रचंड धुके आहेत.समोरून येणारा माणूस देखील दिसणार नाही अशी परिस्थिती आहे.त्यामुळे साधारण तीन वेळा सामन्याच्या टॉसची वेळ बदलण्यात आली होती. अजूनही सामना सूरू होईल की नाही याची शक्यता कमी आहे.
advertisement
यासोबत धरमशालामध्ये तिसरा टी20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात देखील खूप समस्या होत्या. थंडीचे दिवस होते आणि हिमाचलमध्ये सामना खेळवण्यात आला आणि तो यशस्वी पार पडला, पण लखनऊमध्ये तशी अजिबात परिस्थिती नाही. त्यामुळे वर्ल्ड कपच्या तोंडावर बीसीसीआयकडून मोठी चूक घडली आहे.
बीसीसीआयच्या या चुकीमुळे टीम इंडियाला वर्ल्ड कपची तयारी करण्यास प्रचंड त्रास झाला. त्यात टीम इंडियाकडे टी20 वर्ल्ड कपचे संयूक्त यजमानपद आहे.जर अशीच चूक बोर्डाकडून पुढे घडली तरी प्रचंड महागात पडू शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 9:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : ना पाऊस, ना वादळ चौथा टी20 सामना का रद्द झाला? बीसीसीआयवर मोठी नामुष्की










