IND vs UAE : टीम इंडियाचा रेकॉर्ड ब्रेक विजय राहिला बाजूला, 'या' फोटोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या,डोळे पाणावणारा क्षण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
युएईला 9 विकेटसने धुळ चारत टीम इंडियाने आशिया कपमध्ये विजयी सूरूवात केली आहे.या सामन्यात टीम इंडियाने बॉलर्सनी युएईला अवघ्या 57 धावांवर ऑल आऊट केले होते. त्यामुळे टीम इंडियासमोर 58 धावांचे लक्ष्य होते.
IND vs UAE, Asia Cup : युएईला 9 विकेटसने धुळ चारत टीम इंडियाने आशिया कपमध्ये विजयी सूरूवात केली आहे.या सामन्यात टीम इंडियाने बॉलर्सनी युएईला अवघ्या 57 धावांवर ऑल आऊट केले होते. त्यामुळे टीम इंडियासमोर 58 धावांचे लक्ष्य होते. हे आव्हान टीम इंडियाने 4.3ओव्हरमध्ये गाठत हा सामना जिंकला आहे.टीम इंडियाचा हा रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला होता. पण हा विजय राहिला बाजूला आणि चाहत्यांच्या नजरा एका फोटोवर खिळल्या आहेत.त्यामुळे त्या फोटोमध्ये नेमके काय आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर हा फोटो दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसुन विराट कोहली आणि रोहित शर्माचा आहे.आजच्या सामन्यात या दोन्ही स्टार खेळाडूंच्या फोटोचे पोस्टर मैदानात झळकले होते.त्यामुळे चाहत्यांना विराट कोहली आणि रोहित शर्माची आठवण आली होती. त्यामुळे दोन्ही खेळाडूंची चाहत्यांना आठवण आली होती.
Indian fans missing Rohit Sharma & Virat Kohli in Asia Cup. ❤️ pic.twitter.com/z7AAQholpe
— Johns. (@CricCrazyJohns) September 10, 2025
advertisement
2024 टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने एकत्रितपणे या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.या निवृत्तीनंतर खेळाडूंची आठवण चाहते काढत आहेत. तसेच टी20 नंतर या दोन्ही खेळाडूंनी टेस्टमधून निवृत्ती जाहीर केली होती. या दरम्यान ते शेवटचे आयपीएलमध्ये खेळताना दिसले होते.आयपीएलनंतर हे दोन्ही ऑस्ट्रेलिया विरूद्ध ऑक्टोबरमध्ये खेळणार आहे. या सामन्यात दोन्ही खेळाडू खेळताना दिसणार आहे.त्यामुळे चाहते या दौऱ्याची वाट पाहत आहेत.
advertisement
कसा रंगला सामना ?
टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.त्यामुळे युएई प्रथम फलंदाजीसाठी उतरली होती.युएईच्या सलामीवीरांनी चांगली सूरूवात केली होती. अलिशान शराफूने 17 बॉलमध्ये 22 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर मुहम्मद वसीमने 19 धावा केल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंचे विकेट पडल्यानंतर इतर 8 खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद झाले होते.अशाप्रकारे युएई 13 ओव्हर 1 बॉलमध्ये 57 धावांवर ऑल आऊट झाली होती.
advertisement
टीम इंडीयाच्या गोलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 4,शिवम दुबेने 3, जसप्रीत बुमराह,अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
टीम इंडियासमोर 58 धावांचे लक्ष्य होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 4.3 ओव्हरमध्ये हे आव्हान पुर्ण केले होते. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने 30 धावा केल्या होत्या.त्याच्यासोबत शुभमन गिल 20 आणि सुर्यकुमार यादव 7 वर नाबाद राहिला.अशाप्रकारे भारताने 9 विकेट राखून हा सामना जिंकला.
advertisement
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
संयुक्त अरब अमिराती (प्लेइंग इलेव्हन): मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेटकिपर), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहीद खान, जुनैद सिद्दिकी, सिमरनजीत सिंग
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 11:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs UAE : टीम इंडियाचा रेकॉर्ड ब्रेक विजय राहिला बाजूला, 'या' फोटोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या,डोळे पाणावणारा क्षण