छत्रपती संभाजीनगर : पूर्वी वाहतूक नियम मोडणाऱ्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करणे फार कठीण जात असे. आता मात्र, रस्त्यांवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. गाडी चालवताना कोणताही नियम मोडल्यास हे कॅमेरे लगेच गाडीचा फोटो काढतात. यानंतर गाडी चालकाच्या मोबाइलवर चालानचा मेसेज येतो. काही लोकांना चालान फाटल्याची माहितीही कळत नाही किंवा त्यांना मेसेजही दिसत नाही. अशा स्थितीत त्यांना दंडाबाबत माहिती मिळत नाही आणि ते दंड भरतही नाहीत. वारंवार असे झाल्यास गाडी ब्लॅक लिस्ट होण्याचा धोका असतो. जर तुम्ही ट्रॅफिक चलान वेळेवर भरले नाही तर तुमची गाडी ब्लॅक लिस्ट केली जाते.
Last Updated: November 27, 2025, 13:55 IST