आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढच्या काही दिवसात एकमेकांविरोधात असणार आहेत. त्यात आता अजित पवार यांनी भाजपवर जळजळीत टीका केली आहे. त्यामुळे राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. तेव्हा अजित पवार म्हणाले, "ज्यांनी ज्यांनी आरोप केला त्यांच्यासोबत मी सरकार मध्ये आहे. भाजपची राक्षसी भूक शहरातली परिस्थिती बिघडवत आहे." असं म्हणत त्यांनी भाजपवर बोचरा वार केला आहे.



