पुणे : गेल्या काही वर्षांपासून प्रॉपर्टीच्या वादावरून ज्येष्ठ नागरिकांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणी, एकटेपणा, नातेसंबंधांतील दुरावा, मुलांकडून होणारा तिरस्कार अशा प्रसंगांना अनेक ज्येष्ठ नागरिकांना सामोरं जावं लागतं. या सगळ्या अनुभवांमुळे त्यांच्या आयुष्यात एकाकीपणा आणि नैराश्य वाढू लागते. आपल्या अडचणी कोणाला सांगायच्या? हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो. याच समस्या दूर करण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 10 कोटी वृद्ध नागरिकांनी यावरती तक्रार केली आहे. तर 2025 मध्ये महाराष्ट्रातील 4 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला आहे.
Last Updated: December 08, 2025, 18:09 IST