Success Story : शेतीला जोडधंदा म्हूणन केलं शेळीपालन, शेतकऱ्याची वर्षाला निव्वळ 3 लाख कमाई, सांगितला यशाचा मंत्र
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतीला जोडधंदा म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी शेळीपालन व्यवसाय करत अधिकाधिक उत्पन्न घेत आहे. असाच एक प्रयोग शेतकरी शंकर चव्हाण यांनी केला आहे.
सोलापूर : शेतीला जोडधंदा म्हणून महाराष्ट्रातील शेतकरी शेळीपालन व्यवसाय करत अधिकाधिक उत्पन्न घेत आहे. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी शंकर चव्हाण यांनी केला आहे. 5 एकर शेती असूनही गेल्या चार ते पाच वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करत आहेत. तर या शेळीपालन व्यवसायातून शंकर चव्हाण हे वर्षाला 2 ते 3 लाख रुपयांची कमाई करत आहेत.
मोहोळ तालुक्यातील पापरी या गावात शंकर चव्हाण यांची 5 एकर शेती आहे. शेळीपालन व्यवसाय सुरू करत असताना त्यांनी 4 शेळ्यांपासून हा व्यवसाय सुरू केला होता. त्या शेळ्यांपासून जन्मलेल्या बोकडांची विक्री केली आणि पुन्हा काही शेळ्या घेतल्या. आज शंकर यांच्याजवळ 20 ते 25 शेळ्या आहेत. शेळ्यांना दररोज रानात चारायला घेऊन जातात. रात्री आणि सकाळी शेळ्यांना खाण्यासाठी मक्का, सुका चारा खाण्यासाठी देतात. एका बोकडाच्या पिल्लाची किंमत 5 ते 6 हजार रुपये आहे, तर बोकडाला चांगला सांभाळलेला असेल तर 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत विक्री होते.
advertisement
महत्त्वाचे म्हणजे शेतकरी शंकर चव्हाण यांना बोकडांची विक्री करण्यासाठी कोणत्याही बाजारात किंवा इतर ठिकाणी जावे लागत नाही. स्वतः व्यापारी शंकर यांच्याकडे बोकड खरेदी करण्यासाठी येतात. तर या शेळी विक्रीच्या व्यवसायातून 2 ते 3 लाख रुपयांची कमाई करत आहेत. शेतकऱ्यांनी शेती करत करत शेळीपालनाचा व्यवसाय केल्यास नक्कीच फायदा होईल, असा सल्ला शेतकरी शंकर चव्हाण यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Nov 15, 2025 5:03 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतीला जोडधंदा म्हूणन केलं शेळीपालन, शेतकऱ्याची वर्षाला निव्वळ 3 लाख कमाई, सांगितला यशाचा मंत्र







