शेतकरी सीताराम रणदिवे हे पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावाचे आहेत. ते गेल्या काही काळापासून ऊस शेतीतून विक्रमी उत्पन्न घेत आहेत. ऊस शेतीच्या यशाचं गुपित सांगताना शेतकरी सीताराम रणदिवे सांगतात की, “उसाची लागवड करण्याअगोदर पूर्व मशागत करून घ्यावी. नांगरणी, फण, रोटर फिरवणे व त्यानंतर सरी सोडून 86032 या उसाची लागवड केली. हा ऊस ‘ऊस संशोधन केंद्र पाडेगाव’ येथून आणला असून या उसाची व्हरायटी चांगली आहे.”
advertisement
शेतकरी मालक सोडून गेला हे त्याला मान्यचं नव्हतं, 9 दिवसांपासून तो चितेजवळ बसलेला! अख्खं गाव हळहळलं
सीताराम यांनी 2024 मध्ये या उसाची लागवड केली आहे. उसाची लागवड करत असताना सरी साडेचार फूट ठेवलेली आहे. तर उसातील अंतर चांगले सोडल्याने उगवण क्षमता देखील चांगली आहे, असे ते सांगतात.
सीताराम रणदिवे यांनी संपूर्ण ऊस शेती सेंद्रिय पद्धतीने केली आहे. सेंद्रिय शेती करण्यासाठी त्यांनी 86032 हे उसाचे वाण निवडले. उसाची हार्वेस्टिंग 13 ते 17 महिन्यात करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी हा ऊस वरदानदायी आहे तर कारखान्यांसाठी याची रिकव्हरी चांगली आहे. शेतकरी व कारखानदार या दोन्हींना केंद्रबिंदू मानून ही व्हरायटी अतिशय चांगल्या पद्धतीची ठरली आहे. या जातीच्या उसाचे एकरी उत्पन्न 70 ते 80 टनापर्यंत निघते. तर हीच शेती सेंद्रिय पद्धतीने केल्यास उत्पन्न 100 ते 125 टनापर्यंत निघत असल्याचेही रणदिवे सांगतात.





