हिवाळ्यात आहार कसा असावा?
हिवाळ्यात आपल्याला भूक जास्त लागते. या काळात स्निग्ध आणि गोड पदार्थ आहारात असावेत. आयुर्वेदानुसार या जेवणात तूप असणं फार महत्वाचे आहे. कारण आपल्या शरीरातील इंधन हे जास्त पेटलेले असते. आपल्याला हिवाळ्यात घाम येत नसल्यामुळे शरीरातील गरमी बाहेर पडत नाही. त्यामुळे आपल्याला सतत भूक लागत असते. त्यासाठी जेवण जास्त करावे लागते.
advertisement
असाध्य रोगातून मिळेल मुक्ती, आजच सुरू करा अनुलोम विलोम, हे फायदे माहितीयेत का?
गोड पदार्थ किती खावेत?
आपल्याला हिवाळ्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. गोड पदार्थ हे पचण्यासाठी जड असतात. त्यामुळे या काळता गोड पदार्थ खाणे चांगले असते. विशेषत: गोड पदार्थ हे तेल आणि तुपात बनवलेले असतात. त्यामुळेही हिवाळ्यात ते खाणे फायद्याचे असते. थंडीच्या काळात विशेषत: डिंकाचे लाडू खाणे चांगले असते. कोणताही आहार घेताना तो योग्य प्रमाणात घेणे आरोग्यासाठी लाभदायी असते, असे डॉ. अक्षय जैन सांगतात.
हिवाळ्यात घरीच करा ‘ही’ योगासने; मन आणि शरीर राहील तंदुरुस्त Video
हे खाणं टाळावं
हिवाळ्यात वात निर्माण करणारे पदार्थ खाऊ नयेत. चणे, हरभरा वटाणे असे पदार्थ शक्यतो टाळावेत. या पदार्थांच्या सेवनाने वात तसेच वृक्षता वाढते. त्यामुळे या पदार्थांऐवजी तेलकट, तुपकट आणि गोड पदार्थ खावेत, असेही डॉ. जैन सांगतात.