TRENDING:

लग्न होऊन ४ दिवस झाले नाही, तोच कुटुंबाचा आधार गेला; नवरदेवाच्या डोळ्यांदेखत कुटुंबातील ५ जणांचा अंत!

Last Updated:
बार्शी-लातूर महामार्गावर घारी शिवारात ट्रक-कार अपघातात कांबळे आणि वाघमारे कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, अनिकेत आणि मेघना बचावले, परिसरात शोककळा.
advertisement
1/7
लग्न होऊन ४ दिवस झाले नाही, तोच कुटुंबाचा आधार गेला; नवरदेवाच्या डोळ्यांदेखत...
प्रितम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: लग्नानंतर कुलदैवताचे दर्शन घेऊन वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्याच्या मार्गावर नियतीने क्रूर घात केला आहे. विवाह सोहळा नुकताच पार पडलेल्या नवदाम्पत्याला घेऊन तुळजापूरकडे देवदर्शनासाठी जात असलेल्या कारला भीषण अपघात झाला. बार्शी-लातूर राष्ट्रीय महामार्गावर घारी शिवारात भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
2/7
हा अपघात रविवार संध्याकाळी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर कार पुलावरून थेट खाली कोसळली आणि तीन-चार वेळा पलटी झाली. यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात तिन्ही महिला आणि दोन पुरुषांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
3/7
मृतांमध्ये गौतम भगवान कांबळे (वय ६५), जया गौतम कांबळे (वय ६०), नवरीची मावशी (सर्व रा. पनवेल), तसेच सारिका संजय वाघमारे (वय ४५) आणि संजय तुकाराम वाघमारे (वय ५०, रा. कुर्डूवाडी) यांचा समावेश आहे. ट्रकचेही मोठे नुकसान झाले असून तो रस्त्याच्या खाली पलटी झाला.
advertisement
4/7
अपघातात कारमधील सातपैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असला तरी, अवघ्या चार दिवसांपूर्वी लग्न झालेले नवविवाहित दाम्पत्य, अनिकेत गौतम कांबळे (वय २८) आणि मेघना अनिकेत कांबळे (रा. दोघे पनवेल) हे दैवाने बचावले आहेत.
advertisement
5/7
आपल्या डोळ्यांदेखत कुटुंबातील पाच सदस्यांचा झालेला मृत्यू पाहून या दोघांनाही मोठा भावनिक धक्का बसला आहे. हे जखमी दांपत्य सध्या बार्शी येथील जगदाळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. कुटुंबातील पाच सदस्यांच्या मृत्यूमुळे कांबळे आणि वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
6/7
चार दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर अनिकेत आणि मेघना हे नवदांपत्य पनवेलहून कुर्डूवाडी येथील मामांना घेऊन कुलदैवताच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे जात होते. बार्शी-लातूर महामार्गावर घारीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जांभळबेट येथील पुलावर ही दुर्घटना घडली. भरधाव मालट्रकने समोरून कारला जोरदार धडक दिली आणि होत्याचे नव्हते झाले.
advertisement
7/7
हा अपघात एवढा भीषण होता की, कार पुलावरून खाली जाऊन चक्काचूर झाली. घटनास्थळी पुलावर गार्ड स्टोन नसल्याचे दिसून आले आहे. अपघातानंतर लगेचच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. मात्र, पाच जणांना जीव गमवावा लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
लग्न होऊन ४ दिवस झाले नाही, तोच कुटुंबाचा आधार गेला; नवरदेवाच्या डोळ्यांदेखत कुटुंबातील ५ जणांचा अंत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल