मुंबई : राज्यातील वातावरणात पुन्हा बदल घडून आले आहेत. राज्यात काही भागांतील किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात होणार आहे. नाशिकमधील किमान तापमानात सर्वाधिक घट होऊन ते 11 अंशावर आले आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा किमान तापमानात कधी घट तर कधी वाढ झालेली बघायला मिळत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. मुंबईमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत मुंबईतील किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. पुण्यामधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमानात 2 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे.
जालन्याची भेंडी निघाली थेट युरोपला, शेतकऱ्यांना मिळाले इतके पैसे
छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमानात पुढील काही दिवसांत घट होऊन 11 अंशावर येण्याची शक्यता आहे.
नाशिकमधील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवस नाशिकमधील किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. नाशिकमधील किमान तापमानात घट झाल्याने तेथील नागरिकांना कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
नागपूरमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत नागपूरमधील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. काही भागांत ढगाळ वातावरण तर काही भागांत निरभ्र आकाश असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर किमान तापमानात देखील चढ उतार होत आहे. 23 जानेवारीला नाशिकमध्ये सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात देखील पुढील काही दिवसांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.





