रेल्वे क्रॉसिंगमुळे रेल्वेच्या वक्तशीरपणावर परिणाम होत आहे. एक क्रॉसिंग गेट उघडून बंद करण्यासाठी सरासरी 3 ते 7 मिनिटे लागतात. एकदा फाटक उघडले की दोन्ही बाजूंच्या गाड्या रूळ ओलांडतात. सगळ्या गाड्या जाईपर्यंत लोकल थांबवावी लागते. त्याचा फटका रेल्वे प्रवासाला बसतो, असे अधिकारी सांगतात.
advertisement
दिवा हे उपनगरीय मार्गावरील वर्दळीचं स्थानक आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसांतून सरासरी किमान 39 वेळा लेव्हल क्रॉसिंगसाठी फाटक उघडले जाते. त्याचा परिणाम येथून रोज धावणाऱ्या लोकलवर होतो. येथून रोज 894 लोकल धावतात. यातील 70 ते 75 टक्के लोकल या स्थानकावर थांबतात. याचा परिणाम रेल्वेच्या वक्तशीरपणावर होत असून नव्या निर्णयाचा याठिकाणी फायदा होणार आहे.
दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही 10 एलसी गेट बंद करण्यासाठी आणि आरओबी बांधण्यासाठी आधीच निविदा मागवल्या आहेत. ज्यामुळे रेल्वेचे कामकाज आणखी सुधारेल. डिसेंबरपर्यंत या कामांसाठीची प्रक्रिया होईल. हे एलसी गेट मुंबईच्या उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकावर असले तरी, खोपोली आणि कर्जतहून सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्यांवर त्यांचा परिणाम होत होता.






