पुणे: परंपरा, साधेपणा आणि अस्सल मराठी चवीचं प्रतीक म्हणून ओळखले जाणारे सदाशिव पेठेतील स्वयंपाक घर पोळी भाजी केंद्र आजही आपल्या जुन्या चवी आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे तितकंच लोकप्रिय आहे. 1987 साली सुरू झालेलं हे केंद्र आज 38 वर्षे पूर्ण करत असून, तीन पिढ्यांनी एकत्र येऊन हा व्यवसाय टिकवून ठेवला आहे. याठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी असते.