Dharmendra Health Update : अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, मागील 11 दिवसांपासून रुग्णालयात दाखल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dharmendra Passes Away: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागील 11 दिवसांपासून ते रुग्णालयात आहेत. त्यांच्या डॉक्टरांची स्पेशल टिम लक्ष ठेवून आहे.
मुंबई: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र गेल्या 11 दिवसांपासून मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.
भारतीय सिनेमाच्या इतिहासात धर्मेंद्र यांना सर्वात हँडसम अभिनेता मानले जाते. एकदा धर्मेंद्र यांना पाहून देव आनंद म्हणाले होते की, असा चेहरा माझा का नाही?" त्यांची शरीर प्रकृती आणि चेहऱ्यावरील तेज पाहून एकदा दिलीप कुमार यांनीही म्हटले होते की, त्यांना पुढील जन्मी धर्मेंद्र यांच्यासारखी व्यक्ती व्हायचे आहे. धर्मेंद्र वयाच्या या टप्प्यावरही स्वतःला फिट ठेवतात. त्यांचे मत आहे की, वय हा केवळ एक आकडा आहे. आपल्याला श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत रोमँटिक चित्रपट करायचा होता.
advertisement
दिलीप कुमार यांच्यामुळे मिळाली प्रेरणा
धर्मेंद्र यांनी अनेकवेळा खुलासा केला होता की- त्यांना चित्रपटांमध्ये येण्याची प्रेरणा दिलीप कुमार यांचे चित्रपट पाहून मिळाली. धर्मेंद्र दहावीत असताना त्यांनी पहिल्यांदा दिलीप कुमार यांचा 'शहीद' चित्रपट पाहिला होता. यानंतर त्यांना दिलीप कुमार यांच्या अभिनय कौशल्याची भुरळ पडली.
advertisement
मी नोकरी करायचो आणि सायकलवरून कामाला जायचो. जिथे जिथे चित्रपटांचे पोस्टर्स लागायचे, तिथे मी स्वतःची झलक पाहायचो. रात्रभर जागायचो आणि असंभव स्वप्ने बघायचो. सकाळी उठून आरशाला विचारायचो की 'मी दिलीप कुमार बनू शकतो का?'" धर्मेंद्र दिलीप कुमार यांना नेहमीच प्रेरणा स्थान, भाऊ आणि आदर्श मानत आले होते.
advertisement
दिलीप कुमार आणि देव आनंद यांची प्रशंसा
1997 मध्ये 42 व्या फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये धर्मेंद्र यांना लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला होता. हा पुरस्कार दिलीप कुमार यांनी स्वतः धर्मेंद्र यांना दिला होता. दिलीप कुमार देखील धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चाहते होते. अवॉर्ड शो दरम्यान ते म्हणाले होते की- जेव्हा मी पहिल्यांदा धरम यांना पाहिले, तेव्हा पाहताच माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली, ईश्वसाने मला असेच बनवले असते तर काय बिघडले असते?
advertisement
दिग्दर्शक अशोक त्यागी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, पहिल्यांदा जेव्हा देव आनंद यांनी धर्मेंद्र यांना पाहिले, तेव्हा ते उद्गारले होते की, "हे देवा, तू हे रूप मला का नाही दिले?"
धर्मेंद्र जेव्हा मुंबईत फिल्मफेअर स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले होते, तेव्हा स्पर्धेत आलेल्या सर्वांना एका शूटिंगच्या ठिकाणी नेण्यात आले होते. तिथे देव आनंद यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. देव साहेबांनी सांगितले होते की, दूर गर्दीत उभे असलेल्या धर्मेंद्र यांना पाहून ते म्हणाले होते की, हे देवा, तू मला ही शक्ल का दिली नाहीस. एवढेच नव्हे तर, धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाने ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्यांना बोलावून आपले दुपारचे जेवणही त्यांच्यासोबत वाटून घेतले होते.
advertisement
संघर्ष आणि पहिला चित्रपट
धर्मेंद्र यांनी चित्रपटांमध्ये येण्यासाठी खूप संघर्ष केला. त्यांनी अभिनय कोठूनही शिकला नव्हता. फिल्मफेअरच्या टॅलेंट हंट स्पर्धेत अनेक प्रतिभावान लोकांना मागे टाकून त्यांनी विजय मिळवला. टॅलेंट हंट जिंकल्यानंतर ते मुंबईला आले, पण चित्रपटांचा मार्ग सोपा नव्हता. चित्रपट निर्मात्यांच्या कार्यालयाचे हेलपाटे घेण्यासाठी ते मैलोन् मैल चालत जात, जेणेकरून पैसे वाचवून काहीतरी खाऊ शकतील. अनेकदा ते चणे खाऊन बाकावर झोपत आणि कधीकधी तर चणेही नशिबात नसायचे.
advertisement
धर्मेंद्र यांना दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांनी 'दिल भी तेरा हम भी तेरे' या 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या चित्रपटात संधी दिली. या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना 51 मिळाले होते. यानंतर धर्मेंद्र यांनी अर्जुन हिंगोरानींसोबत जेवढे चित्रपट केले, त्यासाठी त्यांनी नाममात्रच पैसे घेतले. त्यांनी आयुष्यभर हिंगोरानी कुटुंबाचे आभार मानले आणि कधीही पैशाची मागणी केली नाही.
'वय केवळ एक आकडा!'
धर्मेंद्र आतापर्यंत 306 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी ॲक्शन हिरोपासून ते रोमँटिक आणि हास्य भूमिकाही केल्या आहेत.
प्रोड्युसर-दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांनी सांगितले की, धरम जी यांच्यासोबत त्यांचा ट्यूनिंग इतकी चांगला होता की, जर दोन दिवस आधीही त्यांना शूटिंगसाठी विचारले तर ते कधीही पैशांची चर्चा करत नसत. ते म्हणायचे की, हिंदुस्थानात अभिनेत्याला 60 वर्षांच्या वयात म्हातारा ठरवले जाते. हॉलिवूडमध्ये 60-65 वर्षांचा अभिनेता लव्ह स्टोरी करतो.
धर्मेंद्र यांनी एकदा बोकाडिया यांना सांगितले होते की, त्यांना श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत एक लव्ह स्टोरी चित्रपट करायचा आहे आणि ते त्यात हिरो बनून येतील.
मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांचा राग
धर्मेंद्र यांचे हँडसम दिसणे काही लोकांना आवडले नव्हते. धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या वाढत्या जवळीकमुळे मीना कुमारी यांचे पती कमाल अमरोही नाराज होते. नंतर ते वेगळे झाले असले तरी त्यांच्यात प्रेम कायम होते. नंतर धर्मेंद्र देखील मीना कुमारींना सोडून पुढे गेले, पण कमाल अमरोही हे धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या जवळीकतेची गोष्ट विसरले नव्हते. जेव्हा त्यांनी धर्मेंद्र यांना घेऊन 'रझिया सुल्तान' चित्रपट बनवला, तेव्हा एका दृश्यात त्यांनी धर्मेंद्र यांचा चेहरा काळा करून घेतला. चित्रपट क्षेत्रातील लोकांनी सांगितले होते की, या दृश्याची चित्रपटात कोणतीही गरज नव्हती. कमाल अमरोही यांनी मीना कुमारी यांच्यावरून धर्मेंद्र यांच्यावर सूड उगवला, असे मानले जाते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 8:45 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dharmendra Health Update : अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, मागील 11 दिवसांपासून रुग्णालयात दाखल


