पाऊस, धुकं आणि 2 महाकाय गव्यांची झुंज! आंबा घाटात निसरड्या कड्यावर घडला थरार, पण...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
साधारण प्रत्येकी 1000kg वजनाच्या महाकाय गवा रेड्यांची आंबा घाटात जोरदार झुंज सुरू झाली. उंच कड्यावर सुरू असलेल्या झुंजीवर गव्यांचा तोल गेला आणि...
कोल्हापूर : साधारण प्रत्येकी 1000kg वजनाच्या महाकाय गवा रेड्यांची आंबा घाटात जोरदार झुंज सुरू झाली. उंच कड्यावर सुरू असलेल्या झुंजीवर गव्यांचा तोल गेला आणि ते 100 फूट खालीर कोसळले. ते 2 गावे थेट महामार्गाव येऊन आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळकदरा येथील उजव्या कड्यावर घडली असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.
गवे झुंजू लागले अन् घाटात कोसळले
आंबा घाटातील हा परिसर घनदाट जंगलांना आणि पावसाच्या वातावरणात धुक्यांनी भरलेला असतो. येथे नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे कळकदरा येथील उजवा कडा कापण्यात आला आहे. याच्या ठिकाणी गवा रेड्यांची झुंज सुरू झाली आणि त्यांचा तोल गेली. त्यामुळे ते थेट 100 खोली कोसळले आणि महामार्गावर येऊन पडले. त्यातच त्यांच्या मृत्यू झाला.
advertisement
प्रचंड पावसांत अन् धुक्यात घडली घटना
घटनेच्या वेळी घाटात प्रचंड पाऊस सुरू होता. तसेच मोठ्या प्रमाणात धुकेदेखील पसरले होते. सकाळी 9 वाजता घाटातील कामगार कामावर आले असता, त्यांच्या वाहनासमोरच गवे येऊ कोसळले. कामागारांना जवळ जाऊन पाहिले, दोन्ही गव्यांचा जागीत मृत्यू झाला होता. त्यांनी रत्नागिरी परिक्षेत्र वनधिकारी यांना माहिती दिली आणि त्यांचा पंचनामा करण्यात आला.
advertisement
हे ही वाचा : Karad News: अल्पवयीन लेकीची मिळाली साथ, बापाने सुरू केल्या घरफोड्या; पोलिसांनी कसा घेतला शोध?
हे ही वाचा : Crime: दारूच्या नशेत मित्राला दगडाने ठेचलं, लपून बसला व्यसनमुक्ती केंद्रात... पण पुढे काय घडलं?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2025 1:04 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
पाऊस, धुकं आणि 2 महाकाय गव्यांची झुंज! आंबा घाटात निसरड्या कड्यावर घडला थरार, पण...