Health Tips : भात खाऊनही वाढणार नाही शुगर आणि वजन! फक्त अशा पद्धतीने शिजवा तांदूळ
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
भारतीय लोकांचे संपूर्ण अन्न म्हणजे वरण-भात-भाजी आणि चपाती. वरण आणि भाताशिवाय तर बऱ्याच लोकांचे जेवण अपूर्ण असते. यामुळे भूक तर शमते. मात्र, आपल्या बऱ्याच लोकांना समस्या ही आहे की दुपारी भात खाल्ल्यानंतर आपल्याला झोप येऊ लागते, वजन वाढण्याची समस्या होते. चला जाणून घेऊया यामागचे कारण..
advertisement
तांदूळ पाण्यात भिजवून ठेवल्याने त्यातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषले जातात. याशिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील प्रभावित होतो. GI अन्नातील कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढवतात हे मोजते.
advertisement
तांदूळ भिजवण्याचे फायदे : तांदूळ भिजवल्याने एन्झाईमॅटिक ब्रेकडाउन होते. असे केल्याने तांदळामध्ये असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट तुटून त्याचे साध्या साखरेत रूपांतर होते. यामुळे आपले शरीर हे पौष्टिक घटक सहजपणे शोषून घेते. यामुळे GI देखील कमी होतो आणि जेव्हा ते कमी होते तेव्हा तुमची रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहते.
advertisement
भात शिजवताना या गोष्टी लक्षात ठेवा : तांदूळ भिजवण्याचे अनेक फायदे आहेत. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही एक चांगली पद्धत मानली जाते. मात्र, ते 3-4 तास पाण्यात सोडू नका. असे केल्याने जीवनसत्त्वे आणि खनिजे पाण्यात विरघळतील आणि पाण्यासोबत वाहून जातील.
advertisement
advertisement