Milk And Jaggery : दूध आणि गूळ एकत्र का खाऊ नये; गुळाचा चहा, खीर खाल्ल्याने काय होतं?

Last Updated:
Milk And Jaggery Side Effects : दूध आणि गूळ हे दोन्ही स्वतंत्रपणे आरोग्यदायी, फायदेशीर असले, तरी आयुर्वेदानुसार हे एकत्र घेणं म्हणजे विरुद्ध आहार मानला जातो.
1/7
साखरेपेक्षा गूळ हेल्दी मानला जातो. त्यामुळे बरेच लोक साखरेला पर्याय म्हणून गूळ वापरतात. गुळाचा चहा, खिरीतही साखरेऐवजी गूळ वापरतात. पुरणपोळी, गूळपोळी अशा पदार्थांमध्ये तर गूळच वापरला जातो. यापैकी काही पदार्थ दुधाचेच आहेत, तर काही पदार्थ दुधासोबत खाल्ले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, दूध आणि गूळ एकत्र खाऊ नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
साखरेपेक्षा गूळ हेल्दी मानला जातो. त्यामुळे बरेच लोक साखरेला पर्याय म्हणून गूळ वापरतात. गुळाचा चहा, खिरीतही साखरेऐवजी गूळ वापरतात. पुरणपोळी, गूळपोळी अशा पदार्थांमध्ये तर गूळच वापरला जातो. यापैकी काही पदार्थ दुधाचेच आहेत, तर काही पदार्थ दुधासोबत खाल्ले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, दूध आणि गूळ एकत्र खाऊ नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
2/7
दूध आणि गूळ हे दोन्ही पौष्टीक पदार्थ असले तरी आयुर्वेदानुसार दूध आणि गूळ हा विरुद्ध आहार आहे. म्हणजे असे पदार्थ जे एकत्र खाल्ल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
दूध आणि गूळ हे दोन्ही पौष्टीक पदार्थ असले तरी आयुर्वेदानुसार दूध आणि गूळ हा विरुद्ध आहार आहे. म्हणजे असे पदार्थ जे एकत्र खाल्ल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
advertisement
3/7
दूध थंड, जड, कफवर्धक आहे तर गूळ उष्ण, कफवर्धक पण रक्तात लवकर मिसळणारा आहे.  हे दोन्ही गुण एकत्र आल्यावर पचनसंस्थेवर ताण पडतो. दूध आणि गूळ एकत्र घेतल्यावर काही लोकांमध्ये अन्न पूर्णपणे न पचता आतड्यांत चिकट आम तयार होतो, जो विषारी घटक ओळखला जातो. हा आम पुढे अनेक त्रासांचे मूळ ठरतो.
दूध थंड, जड, कफवर्धक आहे तर गूळ उष्ण, कफवर्धक पण रक्तात लवकर मिसळणारा आहे.  हे दोन्ही गुण एकत्र आल्यावर पचनसंस्थेवर ताण पडतो. दूध आणि गूळ एकत्र घेतल्यावर काही लोकांमध्ये अन्न पूर्णपणे न पचता आतड्यांत चिकट आम तयार होतो, जो विषारी घटक ओळखला जातो. हा आम पुढे अनेक त्रासांचे मूळ ठरतो.
advertisement
4/7
दूध, गूळ एकत्र खाल्ल्याने सर्दी, खोकला, छातीत कोंडल्यासारखं, सायनस, अ‍ॅलर्जी यासारख्या समस्या वाढू शकतात. दूध आणि गूळ एकत्र खाल्ल्यास सगळ्यांनाच त्रास होईल असं नाही, पण संवेदनशील लोकांमध्ये  गॅस, पोट फुगणं, आंबट ढेकर, अपचन, त्वचेवर खाज, पिंपल्स, सतत कफ साठणं, थकवा, जडपणा अशा समस्या उद्भवतात.
दूध, गूळ एकत्र खाल्ल्याने सर्दी, खोकला, छातीत कोंडल्यासारखं, सायनस, अ‍ॅलर्जी यासारख्या समस्या वाढू शकतात. दूध आणि गूळ एकत्र खाल्ल्यास सगळ्यांनाच त्रास होईल असं नाही, पण संवेदनशील लोकांमध्ये  गॅस, पोट फुगणं, आंबट ढेकर, अपचन, त्वचेवर खाज, पिंपल्स, सतत कफ साठणं, थकवा, जडपणा अशा समस्या उद्भवतात.
advertisement
5/7
मग आता प्रश्न असा की गूळाचा चहा चालतो का? तर गूळाचा चहा करताना दूध उकळलं जातं चहा उकळतो. गूळ वितळून त्याचे स्वरूप बदलतं.  आयुर्वेदानुसार उष्णतेमुळे काही विरुद्ध गुण कमी होतात. त्यामुळे अधूनमधून गूळाचा चहा घेतल्यास बहुतेक लोकांना त्रास होत नाही पण रोज, जास्त प्रमाणात घेतल्यास कफ वाढू शकतो. सर्दी, कफ, दमा असलेल्या लोकांनी गुळाचा चहा मर्यादित ठेवावा.
मग आता प्रश्न असा की गूळाचा चहा चालतो का? तर गूळाचा चहा करताना दूध उकळलं जातं चहा उकळतो. गूळ वितळून त्याचे स्वरूप बदलतं.  आयुर्वेदानुसार उष्णतेमुळे काही विरुद्ध गुण कमी होतात. त्यामुळे अधूनमधून गूळाचा चहा घेतल्यास बहुतेक लोकांना त्रास होत नाही पण रोज, जास्त प्रमाणात घेतल्यास कफ वाढू शकतो. सर्दी, कफ, दमा असलेल्या लोकांनी गुळाचा चहा मर्यादित ठेवावा.
advertisement
6/7
आता गुळाच्या खिरीचं काय? तर गूळाची खीर म्हणजे दूध, तांदूळ आणि गूळ हे संयोजन आयुर्वेदानुसार अजून जड मानलं जातं. याचा परिणाम पोटात जडपणा, आळस, कफ वाढ, त्वचेचे त्रास होतात. विशेषत: रात्री, सर्दी-कफ असेल, पचनशक्ती  कमजोर असेल गूळाची खीर टाळलेली बरी.
आता गुळाच्या खिरीचं काय? तर गूळाची खीर म्हणजे दूध, तांदूळ आणि गूळ हे संयोजन आयुर्वेदानुसार अजून जड मानलं जातं. याचा परिणाम पोटात जडपणा, आळस, कफ वाढ, त्वचेचे त्रास होतात. विशेषत: रात्री, सर्दी-कफ असेल, पचनशक्ती  कमजोर असेल गूळाची खीर टाळलेली बरी.
advertisement
7/7
गूळ आणि दूध एकत्रित घेतल्याने काय होऊ शकतं, याबाबत डॉ. तुषार कोकाटे यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर सविस्तर मागित दिली आहे.
गूळ आणि दूध एकत्रित घेतल्याने काय होऊ शकतं, याबाबत डॉ. तुषार कोकाटे यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर सविस्तर मागित दिली आहे.
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement