Asia Cup : अख्खी मॅचही 20 ओव्हरची झाली नाही! आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात युएईची धुळधाण, टीम इंडियाची बाजी
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे. भारताने युएईचा 9 विकेटने धुव्वा उडवला आहे.
दुबई : आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे. भारताने युएईचा 9 विकेटने धुव्वा उडवला आहे. युएईने दिलेलं 58 रनचं आव्हान टीम इंडियाने 4.3 ओव्हरमध्ये पार केलं. दोन्ही टीममधला हा टी-20 सामना दोन्ही इनिंग मिळूनही 20 ओव्हरचा झाला नाही. युएईचा पहिले 13.1 ओव्हरमध्ये 57 रनवर ऑलआऊट झाला, यानंतर भारताने हे आव्हान 4.3 ओव्हरमध्येच पार केलं, म्हणजेच दोन्ही इनिंग मिळून हा सामना 17.4 ओव्हरमध्येच संपला.
युएईच्या 58 रनचा पाठलाग करताना भारताकडून अभिषेक शर्माने 16 बॉलमध्ये 30 आणि शुभमन गिलने 9 बॉलमध्ये नाबाद 20 रन केले. कर्णधार सूर्यकुमार यादवने 2 बॉलमध्ये नाबाद 7 रनची खेळी केली. युएईकडून जुनैद सिद्दीकीने अभिषेक शर्माची विकेट घेतली.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारतीय बॉलर्सनी युएईचा 57 रनवर ऑलआऊट केला. 47 रनवर युएईने त्यांची तिसरी विकेट गमावली होती, म्हणजेच 10 रनमध्येच त्यांच्या शेवटच्या 8 विकेट गेल्या. भारताकडून कुलदीप यादव हा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. कुलदीपने 2.1 ओव्हरमध्ये फक्त 7 रन देऊन 4 विकेट घेतल्या, यातल्या 3 विकेट कुलदीपने एकाच ओव्हरमध्ये मिळवल्या.
advertisement
कुलदीप यादवशिवाय शिवम दुबेने 3 विकेट घेतल्या, तर बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर आलिशान शरफू आणि मोहम्मद वसीम या दोन्ही ओपनरनी युएईला चांगली सुरूवात करून दिली. शरफूने 22 तर वसीमने 19 रन केले, पण यानंतर युएईच्या कोणत्याही बॅटरला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 10:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : अख्खी मॅचही 20 ओव्हरची झाली नाही! आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात युएईची धुळधाण, टीम इंडियाची बाजी