18 बॉलमध्ये 11 धावा हव्या होत्या, पण नाशिकच्या पठ्ठयाने अख्खी मॅच फिरवली, महाराष्ट्राचा दणदणीत विजय

Last Updated:

कारण शेवटच्या तीन ओव्हरला गोव्याला 11 धावांची आवश्यकता होती. पण नाशिकच्या रामकृष्ण घोषने अशी गोलंदाजी केली की अख्खी मॅच फिरली होती. त्यामुने सामन्याचा निकाल कसा बदलला? हे जाणून घेऊयात.

ramakrishna ghosh
ramakrishna ghosh
Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज महाराष्ट्राने हारलेली मॅच जिंकून दाखवली आहे. या विजयाचं संपूर्ण श्रेय हे कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रामकृष्ण घोषला जात. कारण शेवटच्या तीन ओव्हरला गोव्याला 11 धावांची आवश्यकता होती. पण नाशिकच्या रामकृष्ण घोषने अशी गोलंदाजी केली की अख्खी मॅच फिरली होती. त्यामुने सामन्याचा निकाल कसा बदलला? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर सामन्यात शेवटच्या क्षणी गोव्याला विजयासाठी 18 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता होता. त्यावेळी रामकृष्ण घोष 48 वी ओव्हर मेडन टाकली. त्यानंतर दुसऱ्या एका बॉलरने 49 व्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या. आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा हव्या होत्या. ही ओव्हर टाकायला रामकृष्ण घोषच आला होता.यावेळी त्याने शेवटची ओव्हरही मेडन टाकली.त्यामुळे महाराष्ट्राने हा सामना 5 धावांनी जिंकला होता.
advertisement
दरम्यान महाराष्ट्राने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्याकडून ललित यादवने नाबाद 57 धावांची अर्ध शतकीय खेळी केली होती. त्याच्यासोबत कश्यप बाखलेने 42 धावांची खेळी केली. या व्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करताआल्याने गोव्याचा डाव 9 विकेट गमावून 244 धावांपर्यंत मजल मारू शकला होता.
advertisement
त्याच्याआधी महाराष्ट्र संघाते 20 ओव्हरमध्ये 52 धावांमध्ये 6 विकेट पडले होते.इथून पुढे संघ 100 धावात ऑल आऊट होईल असे वाटत होते. पण ऋतुराजने महाराष्ट्राचा डाव सावरत नाबाद 134 धावांची शतकीय खेळी केली. ऋतुराज गायकवाडने 134 बॉल 131 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 102 इतका होता.त्याला विकी ओस्टवालने 53 तर राजवर्धन हंगेकरने 32 धावांची साथ दिली होती. त्यामुळे महाराष्ट्राने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 249 धावा केल्या होत्या.
advertisement
ऋतुराजने या धावा करून एक रेकॉर्ड देखील केला आहे. ऋतुराज 57 डावात 15 सेंच्यूरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तर ऋतुराज इतक्याच सेंच्यूरी करणारा अंकित बावणे दुसऱ्या स्थानी आहे, त्याने यासाठी 94 सामने खेळले होते. देवदत्त या क्रमवारीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी मयंक अग्रवाल आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
18 बॉलमध्ये 11 धावा हव्या होत्या, पण नाशिकच्या पठ्ठयाने अख्खी मॅच फिरवली, महाराष्ट्राचा दणदणीत विजय
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement