TRENDING:

'1-2 वर्षांनी प्रेम संपतंच', शिल्पा शेट्टीसोबतच्या लग्नावर पहिल्यांदाच बोलला राज कुंद्रा, म्हणाला 'सगळ्यात कठीण गोष्ट...'

Last Updated:
Shilpa Shetty-Raj Kundra Controversy : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राज कुंद्राने त्याच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
advertisement
1/9
'1-2 वर्षांनी प्रेम संपतंच', शिल्पा शेट्टीसोबतच्या लग्नावर पहिल्यांदाच बोलला राज
मुंबई: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा, व्यावसायिक राज कुंद्रा यांचं नातं नेहमीच चर्चेत असतं. अनेक अडचणी आल्या, तरीही ते दोघे एकमेकांना खंबीर पाठिंबा देत उभे राहिले आहेत.
advertisement
2/9
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राज कुंद्राने त्याच्या लग्नाबद्दल एक मोठा आणि प्रामाणिक खुलासा केला आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
advertisement
3/9
<!--StartFragment --><span class="cf0">राज </span><span class="cf0">कुंद्राने</span><span class="cf0"> एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना एक वेगळाच विचार मांडला. तो म्हणाला, “ते नातं कसलं जे पकडून ठेवावं </span><span class="cf0">लागतं</span><span class="cf1">?</span><span class="cf0"> जर प्रेम असेल, तर ते असेलच. तुम्हाला कोणाला पकडून ठेवण्याची गरज नसते. जर ती तुमची असेल, तर ती तुमच्याकडे परत येईलच.”</span><!--EndFragment --><!--EndFragment -->
advertisement
4/9
तो पुढे म्हणाला की, लग्नात प्रेम फक्त १ ते २ वर्ष टिकतं आणि नंतर ते वितळून जातं. तो म्हणतो, “तुम्ही वडील होता, तुम्हाला मुलं होतात, जबाबदाऱ्या येतात, त्यामुळे क्युट असलेलं प्रेम कमी होतं. तुम्हाला वास्तववादी राहावं लागतं. आपण एकमेकांवर प्रेम करतो, आपण आयुष्यभराचे सोबती आहोत, हे समजून घ्यावं लागतं.”
advertisement
5/9
राजने सांगितलं की, अनेक जोडपी याच टप्प्यावर फसतात, कारण त्यांना वाटतं की त्यांच्या नात्यातील क्युट फेज संपली.
advertisement
6/9
<!--StartFragment --><span class="cf0">राजने </span><span class="cf0">शिल्पासोबतचं</span><span class="cf0"> त्याचं नातं कसं टिकून आहे, याचं गुपितही </span><span class="cf0">सांगितलं</span><span class="cf0">. तो म्हणाला, “शिल्पा आणि मी एक गोष्ट नेहमी करतो. ती म्हणजे, आम्ही प्रत्येक शुक्रवारी रात्री </span><span class="cf0">डेटसाठी</span><span class="cf0"> बाहेर जातो. जेव्हा मुलं विचारतात की कुठे चाललात, तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की ही आई आणि बाबांची वेळ आहे.”</span><!--EndFragment -->
advertisement
7/9
तो पुढे म्हणाला की, भारतीय पालक मुलांना जास्त महत्त्व देतात आणि यामुळे त्यांचं नातं कमकुवत होतं. तो म्हणाला, “तुमची मुलं मोठी होतील आणि स्वतःच्या आयुष्यात पुढे जातील. पण तोपर्यंत तुम्ही तुमच्या नात्याकडे लक्ष दिलं नाही, तर ते नातं वितळून जातं.”
advertisement
8/9
राजसाठी नात्याचा एक साधा फॉर्म्युला आहे, “पहिली प्रायोरिटी तुमच्या पार्टनरला द्या. मुलं महत्त्वाची आहेत, पण नात्यालाही महत्त्व देणं गरजेचं आहे. जितका गूळ घालाल, तितकं गोड लागेल!”
advertisement
9/9
२००९ मध्ये लग्न केलेल्या राज आणि शिल्पाला विआन आणि समीशा अशी दोन मुलं आहेत. शिल्पाचं एक रेस्टॉरंट नुकतंच आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर बंद झालं आहे, पण राज आणि शिल्पा प्रत्येक संकटात एकत्र उभे आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'1-2 वर्षांनी प्रेम संपतंच', शिल्पा शेट्टीसोबतच्या लग्नावर पहिल्यांदाच बोलला राज कुंद्रा, म्हणाला 'सगळ्यात कठीण गोष्ट...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल