Cancer Care: तुम्हालाही वाटतेय कॅन्सरची भीती? फक्त 'या' सवयी बदला, मिटेल चिंता
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Cancer Care : अति ताणतणाव, पुरेशी झोप न घेणे, फास्ट फूडचे अति सेवन अशा सवयींमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि कॅन्सरचा धोका वाढतो. जीवनशैलीत काही मुलभूत बदल केल्यानंतर कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारापासून चार हात दूर राहता येऊ शकतं, याविषयी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रतिक पाटील यांनी 'लोकल 18' ला सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
1/8

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या वाढीमागे आपल्या जीवनशैलीतील काही सवयी कारणीभूत ठरत आहेत.
advertisement
2/8
अति ताणतणाव, पुरेशी झोप न घेणे, फास्ट फूडचे अति सेवन अशा सवयींमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि कॅन्सरचा धोका वाढतो.
advertisement
3/8
जीवनशैलीत काही मुलभूत बदल केल्यानंतर कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारापासून चार हात दूर राहता येऊ शकतं, याविषयी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रतिक पाटील यांनी 'लोकल 18' ला सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
4/8
अनेक जण 8 तासांची झोप घेत नाहीत. झोपे अभावी शरीरावर गंभीर परिणाम होतात आणि कॅन्सर सारख्या आजाराचा धोका वाढतो, असे डॉ. प्रतिक पाटील सांगतात. कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर दररोज 8 तासांची पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
advertisement
5/8
झोपताना अनेकजण मोबाइल शेजारी ठेवतात, पण ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे झोपताना मोबाइल दूर ठेवावा, तसेच झोपण्याच्या किमान एक तास आधी आणि सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईलचा वापर टाळावा, असा सल्ला त्यांनी दिला.
advertisement
6/8
आरोग्य टिकवण्यासाठी आहारात काही बदल करण्याची गरज असल्याचंही डॉ. पाटील सांगतात. त्यांच्या मते, दैनंदिन आहारामध्ये साखरेचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
advertisement
7/8
शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळावी यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळे व पालेभाज्या नियमितपणे खाव्यात. बाहेरून आणलेल्या पालेभाज्या आणि फळे मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजवून मगच खाव्यात.
advertisement
8/8
यासोबतच ताणतणाव टाळणे आणि व्यसनांपासून दूर राहणे हे देखील कॅन्सर टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला देखील ते देतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cancer Care: तुम्हालाही वाटतेय कॅन्सरची भीती? फक्त 'या' सवयी बदला, मिटेल चिंता