TRENDING:

Snake Facts : उन्हाळ्यात का चावतो साप? सर्पदंशाचं हे आहे इंटरेस्टिंग कारण

Last Updated:
उन्हाळ्यात सर्पदंशाची सर्वाधिक प्रकरणं समोर येतात. या कालावधीत असं काय होतं, उन्हाळा आणि सर्पदंशाच्या वाढत्या घटनांचा संबंध काय?
advertisement
1/7
Snake bite : उन्हाळ्यात का चावतो साप? सर्पदंशाचं हे आहे इंटरेस्टिंग कारण
भारतात दरवर्षी 5,8000 हून अधिक लोकांचा साप चावल्यामुळे मृत्यू होतो. सर्पदंशाची सर्वाधिक प्रकरणं समोर येतात ती उन्हाळ्यात. या कालावधीत साप चावण्याच्या घटना वाढतात.
advertisement
2/7
सर्पदंशाच्या घटना आणि आकडेवारीवर नजर टाकली तर बहुतेक प्रकरणं एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान नोंदवली जातात. 80 टक्क्यांहून अधिक साप चावण्याच्या घटना ग्रामीण भागात घडतात. Sciencedaily.com च्या मते, उन्हाळ्यात दैनंदिन तापमानात प्रत्येक अंश सेल्सिअस वाढ झाल्यास साप चावण्याची शक्यता सुमारे 6% वाढते.
advertisement
3/7
उन्हाळ्यात साप चावण्याच्या घटना का वाढतात, उन्हाळ्यात साप जास्त का चावतात, उन्हाळ्यातच ते बिळातून बाहेर का येतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे.
advertisement
4/7
साप हे 'थंड रक्ताचे' प्राणी आहेत. याचा अर्थ ते स्वतःच्या शरीराचे तापमान राखू शकत नाहीत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की तापमान वाढलं की सापाचं शरीरही तापू लागते, ज्यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो.
advertisement
5/7
थंडीच्या दिवसात पुरेशी ऊर्जा न मिळाल्याने सापांची चयापचय क्रिया खूप मंद होते, त्यामुळे ते वेगाने धावू शकत नाहीत आणि शिकारही करू शकत नाहीत. म्हणूनच आपण आपला बहुतेक वेळ झोपण्यात घालवतात. आपली गोळा केलेली ऊर्जा साठवण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
6/7
पण उन्हाळा सुरू होताच तापमान वाढलं की ते त्यांच्या बिळातून बाहेर येतात. उन्हाळ्यात सापांना पुरेशी ऊर्जा मिळत असल्याने आणि त्यांच्या चयापचयाला चालना मिळत असल्याने ते अतिक्रियाशील होतात. ते शिकाराच्या शोधात बाहेर पडतात आणि पुनरुत्पादन देखील करतात.
advertisement
7/7
त्यामुळेच तापमानात वाढ झाल्यामुळे थंड ठिकाणांच्या शोधात साप आपल्या बिळांमधून बाहेर पडतात आणि निवासी भागाच्या आसपास दिसू लागतात. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Snake Facts : उन्हाळ्यात का चावतो साप? सर्पदंशाचं हे आहे इंटरेस्टिंग कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल