अमरावती : जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यातील वातावरणात सतत बदल घडून येत आहे. आधी थंडीचा जोर वाढला. त्यानंतर ढगाळ वातावरण आणि आता किमान तापमानात वाढ होऊन काही भागांत दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान हे 17 अंशापर्यंत तर कमाल तापमान 34 अशांपर्यंत गेले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात 17 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमानात पुढील काही दिवसांत आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
16 लोकांचे एकत्र कुटुंब, फळबाग शेतीतून मिळाली भरारी, प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणा देणारी कहाणी
17 जानेवारीला पुण्यामधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर ढगाळ आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमानात देखील वाढ झाली असल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 जानेवारीला निरभ्र आकाश असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमान पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
नाशिकमध्ये 17 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमधील कमाल तापमानात देखील वाढ झाल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
17 जानेवारीला नागपूरमध्ये धुक्यासह अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. नागपूरमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमधील कमाल तापमानात देखील वाढ झालेली बघायला मिळत आहे. त्यामुळे उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
राज्यातील थंडीचा जोर कमी झाला असून आता काही भागांत उकाडा जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागानं दिली आहे. राज्यातील वातावरणात सतत बदल होत असल्याने नवनवीन आजारांचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.





