
मुंबई: थंडीचे दिवस आले की मुंबईकरांसाठी उत्सवमय वातावरण निर्माण होते. शहरातील वेगवेगळ्या भागांत मेळे, फेअर आणि यात्रा भरतात. अशाच वातावरणात बोरिवलीतील शिंपोली येथील प्रसिद्ध कोरा केंद्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंदी यात्राचे आयोजन करण्यात आले आहे.
Last Updated: November 13, 2025, 12:45 ISTजालना : राज्यात अगदी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडला. यामुळे शेतीची अनेक गणितं देखील बिघडली आहेत. रब्बी हंगाम लांबला असून कोरडवाहू पेरणीची तारीख देखील संपली आहे. परंतु, अशाही परिस्थितीत शेतकरी नवीन हंगामासाठी तयार झाले असून रब्बी पेरणी करताना पहायला मिळत आहे. हरभरा हे राज्यातील प्रमुख रब्बी पीक आहे. यंदा लांबलेल्या हंगामात हरभरा पिकाचे कोणकोणते विकसित वाण आहेत? याबद्दल लोकल18 ने कृषी तज्ज्ञ एस. व्ही. सोनुने यांच्याकडून माहिती घेतली.
Last Updated: November 13, 2025, 16:05 ISTपुणे: पुण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी मेंदूशस्त्रक्रियेदरम्यान पाहिलेल्या मेंदूतील आतील भागांवर आधारित चित्रकलेचा एक अनोखा संग्रह तयार केला आहे. या चित्रप्रदर्शनातून ट्रायजेमिनल न्युराल्जिया आणि हेमीफेशियल स्पॅझमने त्रस्त रुग्णांसाठी निधी उभारण्यात आला आहे. याबाबत त्यांनी लोकल 18 ला अधिक माहिती दिली आहे.
Last Updated: November 13, 2025, 15:44 ISTजालना : आपल्या देशाला जसा भूगोल लाभला आहे. तसाच वैविध्यपूर्ण इतिहास देखील लाभला आहे. अनेक लोकांना ऐतिहासिक वस्तू, घटना, प्रसंग इत्यादींची आवड असते. अनेक लोक आपल्या इतिहासावर गर्व करतात. त्यापैकी काही जण हे ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा प्रयत्न करत असतात. जालन्यातील इतिहास अभ्यासक रामभाऊ लांडे ही मागील अनेक वर्षांपासून अनेक ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करून ठेवत आहेत. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप, होळकर शाहीतील दुर्मिळ छायाचित्रे तसेच सुभेदार मल्हारराव होळकर यांची शाही पगडी इत्यादी गोष्टींचा संग्रह आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण पगडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.
Last Updated: November 13, 2025, 15:10 ISTकोल्हापूर : कोल्हापूरच्या नावसोबतच कोल्हापुरी चवीचे पदार्थ जगप्रसिद्ध आहेत आणि ही चव त्या पदार्थाला येते ती त्या पदार्थातील एका महत्त्वाच्या घटकामुळे. तो घटक म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी होय. आता ही चटणी काय असते, कशी बनते? असे अनेक प्रश्न या चटणीबद्दल बऱ्याच जणांना असतात. मात्र चव, रंग आदी सर्वस्वी त्या चटणीसाठी वापरण्यात येणारी मिरची आणि बनवण्याची पद्धत यावर अवलंबून आहे.
Last Updated: November 13, 2025, 14:31 ISTमुंबई : अनेक तरुण नोकरीसोडून व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. भांडुपमधील प्रणाली पाटील आणि तन्मय मोरे या दोन मित्रमैत्रिणींनी आपल्या जिद्दीच्या जोरावर टीपी मॅगी पॉईंट नावाचे फूड आउटलेट सुरू करून यशाची नवी ओळख निर्माण केली आहे. प्रणालीने नोकरीचा सुरक्षित मार्ग सोडून व्यवसायात उडी घेतली. घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला, परंतु प्रणालीने आणि तन्मयने निर्धाराने हा व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना दुप्पट परत मिळत आहे.
Last Updated: November 13, 2025, 13:58 IST