तब्बल 30 वर्षांनी जुळून येणार 2 राजयोग! 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकण्याची शक्यता
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्र सांगतं की, आपल्या कुंडलीतील ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींवरून आपलं नशीब ठरत असतं आणि ग्रह-तारे वेळोवेळी आपली जागा, स्थिती, दिशा बदलतात. आता तब्बल 30 वर्षांनंतर दोन अत्यंत शुभ योग जुळून येणार आहेत, ज्यांचा कोणाला फायदा होणार सविस्तरपणे जाणून घेऊया. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, एका ठराविक वेळेनंतर सर्व ग्रह राशीपरिवर्तन करतात. म्हणजेच ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. त्यातून शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. सध्या शनी ग्रह कुंभ राशीत विराजमान आहे. तर 31 मे रोजी बुध ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश झाला. यातूनच शश आणि बुध आदित्य राजयोग निर्माण होत आहेत. ज्याचा परिणाम येत्या काळात सर्व 12 राशींवर होईल, मग त्यातून काही राशींच्या व्यक्तींना सुख अनुभवायला मिळेल, तर काही राशींच्या व्यक्तींच्या पदरात दुःख पडेल. परंतु 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब अक्षरश: हिऱ्यासारखं उजळून निघणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
कुंभ : आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, त्या क्षेत्रात भरभरून यश मिळेल. आपल्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते. एकूणच आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल आणि समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
advertisement