Papankusha Ekadashi 2025: पापांकुशा एकादशी म्हणजे काय? नावातच दडलं हे मोठं सार; विष्णू कृपेसाठी करतात या गोष्टी

Last Updated:

Papankusha Ekadashi 2025: एकादशीचे माहात्म्य आणि पापांकुशा एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी. यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळते. नैवेद्य अर्पण झाल्यावर धूप-दीप लावून भगवान विष्णूची आरती करावी.

News18
News18
मुंबई : पापांकुशा एकादशी ही आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या पद्मनाभ स्वरूपाची पूजा केली जाते. पापांवर अंकुश लावणारी (नियंत्रण ठेवणारी) म्हणून या एकादशीला 'पापांकुशा एकादशी' असे नाव मिळाले आहे. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीला (ज्या दिवशी सूर्य मावळतो) एकदाच सात्विक भोजन करावे. या दिवशी तांदूळ, कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. व्रत करणाऱ्यांनी ब्रह्मचर्य पाळावे आणि सात्विक विचार ठेवावेत.
पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. हातात पाणी घेऊन, 'मी आज पापांकुशा एकादशीचे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची प्रतिज्ञा (संकल्प) करतो,' असा उच्चार करून पाणी जमिनीवर सोडावे. पूजास्थळ स्वच्छ करून पाटावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरावे. त्यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. त्यानंतर विष्णूच्या मूर्तीला पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर) आणि शुद्ध पाण्याने स्नान घालावे. श्रृंगार म्हणून श्रीहरी विष्णूंना चंदन, हळद-कुंकू, पिवळी फुले आणि विशेषतः तुळशीची पाने अर्पण करावीत. फळे, मिठाई किंवा साबुदाण्याचे सात्विक पदार्थ (तांदूळ, डाळी नसलेले) नैवेद्यासाठी अर्पण करावेत.
advertisement
एकादशीच्या दिवशी अधिक वेळ विष्णूच्या मंत्रांचा जप करावा.
'ॐ नमो भगवते वासुदेवाय'
किंवा 'हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ।।'
एकादशीचे माहात्म्य आणि पापांकुशा एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी. यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळते. नैवेद्य अर्पण झाल्यावर धूप-दीप लावून भगवान विष्णूची आरती करावी.
advertisement
एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला उपवास सोडला जातो, याला पारण म्हणतात. पारण नेहमी द्वादशी तिथीच्या निर्धारित वेळेतच करावे. पारण मुहूर्त संपण्यापूर्वी उपवास सोडणे आवश्यक आहे. पारणाच्या वेळी तुळशीचे पान खाऊन किंवा साधे सात्विक अन्न (तांदूळ, डाळी) ग्रहण करून उपवास पूर्ण करावा. उपवास सोडण्यापूर्वी गरीब, गरजूंना किंवा ब्राह्मणांना अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या नियमांनुसार पापांकुशा एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि परमगती प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Papankusha Ekadashi 2025: पापांकुशा एकादशी म्हणजे काय? नावातच दडलं हे मोठं सार; विष्णू कृपेसाठी करतात या गोष्टी
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement