RK Story : राज कपूरची दुसरी बायको होण्यासाठी तयार होती नरगिस, प्रेमासाठी थेट गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचली
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Raj Kapoor Nargis : राज कपूर आणि नर्गिस यांची दर्दभरी लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. पण राज कपूर आपल्या पहिल्या पत्नीला सोडायला तयार नसल्याने कायदेशीर सल्ला घेण्यासाठी नरगिस थेट गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या होत्या.
Raj Kapoor Nargis : राज कपूर आणि नरगिस यांची प्रेमकहाणी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात गाजलेल्या आणि कायम चर्चेत असणाऱ्या प्रेमकथांपैकी एक मानली जाते. राज कपूर नरगिसला पाहताच तिच्या प्रेमात पडले होते. नरगिस त्यावेळी खूप देखणी होती. दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले आणि रुपेरी पडद्यावर या जोडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'अंदाज' चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. राज कपूर नरगिसवर प्रचंड फिदा होता. पण राज कपूरांपेक्षाही दुप्पट नगरिस त्यांच्यावर फिदा होती. नरगिसला राज कपूर यांची पत्नी होण्याची खूपच इच्छा होती. पण आधीच विवाहित असलेले राज कपूर आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हते. याच कारणामुळे नरगिस थेट तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्यापर्यंत पोहोचल्या, जेणेकरून कायदेशीर मार्गाने राज कपूरशी लग्न करता येईल का, याबाबत सल्ला मिळू शकेल.
नरगिस आणि राज कपूर यांच्यातील जवळीक 'बरसात' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अधिक वाढली. नरगिसने राज कपूरच्या आर. के. स्टुडिओत आर्थिक गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. नरगिसच्या मैत्रिण नीलमने सांगितले होते की, राज कपूर नेहमीच नरगिसला म्हणायचे की ते तिच्याशी लग्न करतील. पण काळ जसा पुढे सरकरत गेला, तसतसं नरगिसला जाणवायला लागलं की राज कपूर आपल्या पत्नीला कधीच घटस्फोट देणार नाहीत. राज कपूरला घटस्फोट न देता लग्न कसे करता येईल, याचा कायदेशीर मार्ग शोधण्यासाठी नरगिस तेव्हाचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे गेल्या होत्या. लेखिका मधु जैन यांनी त्यांच्या पुस्तकात, 'फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन सिनेमा: द कपूर्स'मध्ये लिहिले आहे की,"राज कपूर यांच्यासोबत लग्न करण्याची नरगिसची इच्छा इतकी तीव्र होती की तिने थेट तेव्हाचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे सल्ला मागितला की ती राज कपूरसोबत कायदेशीररित्या लग्न करू शकेल".
advertisement
राज कपूरही नरगिसशी लग्न करू इच्छित होते. पण त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांना हे मान्य नव्हते. अखेरीस नरगिसलाही हे लक्षात आले की राज कपूर कधीच तिच्याशी लग्न करणार नाहीत आणि त्यांनी राज कपूरच्या आयुष्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नरगिसने कोणालाही न सांगता आर. के. फिल्म्सबाहेरची 'मदर इंडिया' ही फिल्म साइन केली तेव्हा राज कपूर यांना या गोष्टीची जाणीव झाली होती.
advertisement
'या' कारणाने नगरिसने सोडला राज कपूरचा नाद
नरगिसने एकदा राज कपूरला त्यांच्या पत्नीला हार घालताना पाहिले होते आणि त्यानंतरच तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असंही म्हटलं जातं. त्या दिवशी नरगिसने राज कपूरसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचे ठरवले होते. खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही जेव्हा ते आले नाहीत, तेव्हा ती थेट त्यांच्या घरी पोहोचली. तेव्हा त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा होत होता. राज कपूर आपल्या पत्नीला हार घालत होते. त्यानंतर नरगिस थेट तिथून बाहेर पडली.
advertisement
अन् नरगिस सुनील दत्तच्या प्रेमात पडल्या...
view comments'मदर इंडिया' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच नरगिस सुनील दत्तच्या प्रेमात पडली आणि 1958 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. विशेष म्हणजे 'मदर इंडिया' या चित्रपटात सुनील दत्तने नगरिसच्या मुलाची भूमिका साकारली होती. नरगिसने लग्नानंतर चित्रपट करू नये, अशी सुनील दत्तची इच्छा होती. पतीच्या इच्छेचा आदर ठेवत नगरिस यांनी चित्रपटसृष्टीला अलविदा केलं. लग्नानंतर त्यांनी सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 12:52 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
RK Story : राज कपूरची दुसरी बायको होण्यासाठी तयार होती नरगिस, प्रेमासाठी थेट गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचली