उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आलं होतं. यावेळी अंतिम दर्शनासाठी बारामतीकर आणि मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. अलोट गर्दीत बारामतीकरांनी आपल्या लाडक्या नेत्यांचं अंतिमदर्शन घेतलं. उद्या गुरुवारी सकाळी १०.१० वाजता पुन्हा एकदा अजितदादांचं पार्थिव हे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह उपस्थितीत राहणार आहे.
अहिल्यानगर – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सकाळी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून त्यांचा सरकार नेता पुन्हा होणे नाही. अशी श्रद्धांजली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अर्पण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर मोठी गर्दी कार्यकर्त्यांनी केली आहे. अंतिम दर्शनासाठी राज्यातील नेते या ठिकाणी आलेत तसंच जय पवार आणि श्रीनिवास पवार याठिकाणी आले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनाही अश्रू अनावर झाले. अजित दादांच्या निधनाची बातमी कळतात हे दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून अक्षरशः लहान लेकरासारखे धाय मोकलून रडत होते. महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. अजित दादांची मुख्यमंत्री व्हायची इच्छा अपूर्ण राहिली. जर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राचे चित्र काही औरच असतं असेही याप्रसंगी पाटील म्हणाले. 25 जानेवारी रोजी नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी झालेल्या भेटीची आठवणही यावेळी सहकार मंत्री पाटील यांनी करून दिली. तर दादांचे माझ्यावर जीवापाड प्रेम होते दादा मला रागवत असत. घरातील सदस्य गेल्यापेक्षाही मोठे दुःख झाल्याची भावना मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव बारामती रुग्णालयातुन हलवले
अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान मध्ये हलवण्यात आले
रुग्णवाहिकेमध्ये पार्थ पवार पुढे बसले असून कुटुंबातील सदस्य सोबत आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवार यांना फोन
अजित पवार यांच्या निधनानंतर सांत्वनासाठी पीएम मोदींचा शरद पवार यांना फोन
आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या निधनाने आमचा आधारस्तंभ हरपला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. गेली अनेक वर्षे मी त्यांच्यासोबत काम केले. जेव्हा-जेव्हा दादांसोबत भेट होत असे, ते नेहमीच आस्थेने चौकशी करत. तब्येतीची काळजी घेण्याचा नेहमीच सल्ला देत असत. त्यांचे आणि माझे राजकारणापलीकडे कौटुंबिक संबंध होते. दादांचे निधन ही माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी आहे. त्यांच्या निधनाने राजकारणातील एक कुशल प्रशासक, कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले आणि ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व आपण गमावले आहे. जवळपास ३५ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडवले, जनतेसाठी तत्पर असणारे पुरोगामी विचारांचे नेतृत्व घडवले तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव लढा दिला. ज्या ज्या वेळी दादांशी भेट व्हायची, तेव्हा-तेव्हा सामान्य माणसाच्या अडीअडचणी, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, हे आपुलकीने व तळमळीने ते मांडायचे आणि त्यासाठी आग्रही असायचे. सर्वसामान्य जनतेचे लाडके नेतृत्व आज आपल्यात राहिले नाही, ही अत्यंत दुःखद घटना आहे. आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस ठरला आहे. मा. श्री. अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबियांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो. तसेच पवार कुटुंबियांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ॐ शांती
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार
बारामतीमध्ये उद्या अंत्यसंस्कार होणार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल, राज्यसभेतील खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणतात, आम्ही या अपघाताची चौकशी करण्याची मागणी करू… ही एक अतिशय दुःखद घटना आहे. अजित पवार यांचे अकाली निधन झाले. एका कष्टाळू माणसाच्या निधनाने आपण सर्वांना धक्का बसला आहे. या घडीला आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत.
महाराष्ट्रात केलेल्या शाश्वत विकासातून अजित दादा कायम अमर राहतील – माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची समाज माध्यमांतून अजित पवारांना श्रद्धांजली.
पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल
पार्थ पवार यांना अश्रूअनावर
पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना पाहताच कार्यकर्त्यांनी अजित दादा अमर रहेच्या घोषणा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर शिरूर शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली असून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. तर सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचाही सर्वच राजकीय पक्षांनी आज प्रचार बंद ठेवला आहे…
अजित पवार यांच्या निधनानंतर शहर बंद ठेवत व्यापाऱ्यांची अजित दादांना श्रद्धांजली
मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदार संघातील इंदापूर शहर मधील व्यापाऱ्यांनी पाळला दुखवटा
अनपेक्षित धक्का आहे
अजून विश्वास बसत नाही
४ दक्षक स्वतःचा ओळख केली
प्रशासनावर पकड होती
कोविडमधते अडीच वर्ष काम केलं. ऑलंम्पिक मध्ये काम केलं दादा आपल्यात नाही याच दुःख होत आहे
आपल्या सगळ्याच नुकसान आहे
दादा आता नाहीत हे बोलण सुद्धा वेदना देणार आहे
महाराष्ट्राच्या राजकारणात मोजके नेते सर्वपक्षीय नेत्यांचा मानाचे राज करत होते
दादांशिवाय पुण्यच राजकारण कल्पना होत नाही
सगळ्यांचार आघात आहे
मला आज काय बोलाव सुचत नाही
प्रथमदर्शनी जे जाणवतय हा दृष्टीच समस्या होती
विज़िबिलिटीचा प्रॉब्लम मुळे हे झाल अस सुरुवातीला दिसत आहे
अंतिम निष्कर्ष येतील
सगळ्या संस्था निष्पक्ष काम करतील
दादांशिवाय मुंबई आणि पुण्याच राजकारण अधुर राहिल…



