Indian Railways: जनरल कोच संदर्भात भारतीय रेल्वेचा नवीन नियम, काउंटरवर ठराविक लोकांना मिळणार तिकीट, कसं आणि कोणाला मिळणार?

Last Updated:
Indian Railways 2025 : जनरल डब्यांपासून थेट थर्ड एसीपर्यंत अनेक जण आपल्या बजेटनुसार तिकीट काढून प्रवास करतात. पण सध्या रेल्वेच्या प्रवासात काही मोठे बदल होणार आहेत.
1/7
 भारतात लाखो सामान्य नागरिक रोजच्या जीवनात रेल्वेचा वापर करत असतात. ऑफिसला जाणं, गावाला जाणं, किंवा कुठे तरी फिरायला जाणं. अशा सगळ्या गरजे वेळी रेल्वे हेच सर्वसामान्यांचं सगळ्यात सोयीचं, स्वस्त आणि भरवशाचं माध्यम ठरतं. जनरल डब्यांपासून थेट थर्ड एसीपर्यंत अनेक जण आपल्या बजेटनुसार तिकीट काढून प्रवास करतात. पण सध्या रेल्वेच्या प्रवासात काही मोठे बदल होणार आहेत. हे बदल थेट प्रवाशांच्या सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत आणि जनरल डब्यांमधील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आहेत.
भारतात लाखो सामान्य नागरिक रोजच्या जीवनात रेल्वेचा वापर करत असतात. ऑफिसला जाणं, गावाला जाणं, किंवा कुठे तरी फिरायला जाणं. अशा सगळ्या गरजे वेळी रेल्वे हेच सर्वसामान्यांचं सगळ्यात सोयीचं, स्वस्त आणि भरवशाचं माध्यम ठरतं. जनरल डब्यांपासून थेट थर्ड एसीपर्यंत अनेक जण आपल्या बजेटनुसार तिकीट काढून प्रवास करतात. पण सध्या रेल्वेच्या प्रवासात काही मोठे बदल होणार आहेत. हे बदल थेट प्रवाशांच्या सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत आणि जनरल डब्यांमधील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आहेत.
advertisement
2/7
 भारतीय रेल्वेने नुकतेच दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशभरातील सर्व ट्रेन इंजिन आणि डब्यांमध्ये आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, एकूण 15,000 इंजिन्स आणि 74,000 डब्यांमध्ये हे अत्याधुनिक कॅमेरे बसवले जातील. प्रत्येक इंजिनमध्ये 6 कॅमेरे असतील आणि ते कमी प्रकाशात, तसेच ताशी 100 किमी वेगाने ट्रेन चालू असतानाही स्पष्ट दृश्य देतील. गोपनीयतेची काळजी घेत ही यंत्रणा राबवली जाणार आहे.
भारतीय रेल्वेने नुकतेच दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशभरातील सर्व ट्रेन इंजिन आणि डब्यांमध्ये आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, एकूण 15,000 इंजिन्स आणि 74,000 डब्यांमध्ये हे अत्याधुनिक कॅमेरे बसवले जातील. प्रत्येक इंजिनमध्ये 6 कॅमेरे असतील आणि ते कमी प्रकाशात, तसेच ताशी 100 किमी वेगाने ट्रेन चालू असतानाही स्पष्ट दृश्य देतील. गोपनीयतेची काळजी घेत ही यंत्रणा राबवली जाणार आहे.
advertisement
3/7
 तसंच, 15 जुलै 2025 पासून तात्काळ तिकीट बुक करताना आधार आधारित ओटीपी व्हेरिफिकेशन आवश्यक असेल. IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅपवरून तिकीट बुक करताना आधार लिंक करावं लागेल. यामुळे फेक एजंट्स आणि तिकीट घोटाळ्यांवर लगाम बसेल, असं रेल्वेनं सांगितलं.
तसंच, 15 जुलै 2025 पासून तात्काळ तिकीट बुक करताना आधार आधारित ओटीपी व्हेरिफिकेशन आवश्यक असेल. IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅपवरून तिकीट बुक करताना आधार लिंक करावं लागेल. यामुळे फेक एजंट्स आणि तिकीट घोटाळ्यांवर लगाम बसेल, असं रेल्वेनं सांगितलं.
advertisement
4/7
 सध्या एका जनरल डब्यात 300 ते 400 प्रवासी चढतात. ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे नवी दिल्लीत एका पायलट प्रोजेक्ट अंतर्गत एका जनरल डब्यासाठी फक्त 150 तिकीट दिली जातील. यासाठी एक खास सॉफ्टवेअर वापरलं जातंय, जे पुढील 3 तासांत सुटणाऱ्या ट्रेनची संख्या आणि प्रत्येक ट्रेनमधील जनरल डब्यांची गणना करून त्याचप्रमाणे तिकीटांची मर्यादा निश्चित करेल.
सध्या एका जनरल डब्यात 300 ते 400 प्रवासी चढतात. ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे नवी दिल्लीत एका पायलट प्रोजेक्ट अंतर्गत एका जनरल डब्यासाठी फक्त 150 तिकीट दिली जातील. यासाठी एक खास सॉफ्टवेअर वापरलं जातंय, जे पुढील 3 तासांत सुटणाऱ्या ट्रेनची संख्या आणि प्रत्येक ट्रेनमधील जनरल डब्यांची गणना करून त्याचप्रमाणे तिकीटांची मर्यादा निश्चित करेल.
advertisement
5/7
 उदाहरणार्थ, 3 तासांत जर 4 ट्रेन सुटणार असतील आणि प्रत्येक ट्रेनमध्ये 4 जनरल डबे असतील, तर केवळ 2,400 तिकीटच उपलब्ध असतील. या संख्येच्या पलीकडे कोणतेही तिकीट दिले जाणार नाहीत. त्यातही प्रत्येक डब्यासाठी 20% तिकीट फक्त मधल्या स्टेशनवरील लोकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
उदाहरणार्थ, 3 तासांत जर 4 ट्रेन सुटणार असतील आणि प्रत्येक ट्रेनमध्ये 4 जनरल डबे असतील, तर केवळ 2,400 तिकीटच उपलब्ध असतील. या संख्येच्या पलीकडे कोणतेही तिकीट दिले जाणार नाहीत. त्यातही प्रत्येक डब्यासाठी 20% तिकीट फक्त मधल्या स्टेशनवरील लोकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
advertisement
6/7
 याचा फायदा थर्ड एसी कोचमधील प्रवाशांनाही होईल. सध्या अनेक अनारक्षित तिकीटधारक थेट थर्ड एसीमध्ये घुसत असल्यामुळे मूळ तिकीट काढलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. हीच बाब सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली होती.
याचा फायदा थर्ड एसी कोचमधील प्रवाशांनाही होईल. सध्या अनेक अनारक्षित तिकीटधारक थेट थर्ड एसीमध्ये घुसत असल्यामुळे मूळ तिकीट काढलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. हीच बाब सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली होती.
advertisement
7/7
 महाकुंभच्या वेळी नवी दिल्लीत झालेल्या प्रचंड गर्दीनंतर हे बदल करण्यात आले आहेत. जर नवी दिल्ली स्टेशनवरील हा ट्रायल यशस्वी ठरला, तर संपूर्ण देशभरात हा नियम लागू केला जाणार आहे. एकूणच रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि आरामदायक करण्यासाठी हे पावलं उचलण्यात आली आहेत.
महाकुंभच्या वेळी नवी दिल्लीत झालेल्या प्रचंड गर्दीनंतर हे बदल करण्यात आले आहेत. जर नवी दिल्ली स्टेशनवरील हा ट्रायल यशस्वी ठरला, तर संपूर्ण देशभरात हा नियम लागू केला जाणार आहे. एकूणच रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि आरामदायक करण्यासाठी हे पावलं उचलण्यात आली आहेत.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement