हिवाळा सुरू झाला की थंडीबरोबरच सर्दी, खोकला, फ्लू यांसारखे आजार डोकं वर काढतात. या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक ठरते. विशेषतः फळांचा आहारात समावेश केल्याने आरोग्य चांगले राहते आणि थंडीच्या त्रासांपासून बचाव होतो. याबाबत “हिवाळ्यात सिट्रस फळे, सफरचंद, डाळिंब यांचा नियमित वापर करणे अत्यंत फायदेशीर आहे”, अशी माहिती डॉ. शुभम थेटे यांनी दिली.