<p>आपल्या शहरातलं हवामान, हवामानाचा अंदाज आणि अपडेट्स (Weather at my location)मिळणं गरजेचं आहे. हवामानाच्या अचूक अंदाजासाठी आणि खात्रीशीर माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department, IMD)<a href="https://mausam.imd.gov.in/">वेबसाइटवर</a> अधिकृत माहिती मिळू शकते. याशिवाय <a href="https://www.accuweather.com/en/in/pune/204848/current-weather/204848">अॅक्युवेदर</a>सारख्या काही वेबसाइट्सही तुमच्या शहरातल्या, गावातल्या हवामानाविषयी अपडेट्स देत असतात. हवामानासंबंधी बातम्यांचा परिणाम शेतकरी, व्यापारी यांच्यावर होतोच पण तो सर्वसामान्यांच्या दैनंदिव जीवनावर थेटपणे होत असतो.<br />
हवामानाचा अंदाज आणि हवामान खात्याने दिलेले इशारे (Weather Alerts) वेळेवर कळले तर अनेक संकटांपासून वाचता येईल. गेल्या काही वर्षांत अचूक हवामान अंदाज वर्तवणं आधुनिक विज्ञानामुळे शक्य होत आहे.<br />
हवामानातल्या तीव्र बदलांचा थेट दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. थंडीची लाट, उन्हाचा कहर, अवकाळी पाऊस, वादळ, चक्रीवादळ किंवा अतिवृष्टी, विजांचा कडकडाटाचा फटका बसून जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते.<br />
गेल्या काही वर्षांत भारताला हवामान बदलांचा, <a href="https://en.wikipedia.org/wiki/Climate_change">ग्लोबल वॉर्मिंग</a>चा फटका बसला आहे. त्यामुळे अतितीव्र उन्हाळा, अतिवृष्टी, <a href="https://en.wikipedia.org/wiki/Cyclone">चक्रीवादळं</a> आणि अवकाळी पावसासारखी संकटं वारंवार येताना दिसतात.<br />
<a href="https://news18marathi.com/maharashtra/">महाराष्ट्रात</a> पश्चिम किनारपट्टीवर गेल्या काही वर्षांत तीव्र चक्रीवादळं धडकली. त्याचा मोठा फटका बसला आहे. <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईलाही</a> चक्रीवादळाचा फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि विजा पडून अनेक जणांचे जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळ असे तीव्र हवामानाचे इशारे <a href="http://www.imdmumbai.gov.in/">IMD</a> तर्फे दिले जातात. त्याची ताजी माहिती पोहोचली, तर किमान जीवितहानी टाळण्यास मदत होऊ शकते.</p>
अजून दाखवा …